शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘प्राधिकरणा’संदर्भात पंधरा दिवसांत बैठक घेऊन निर्णय: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:55 IST

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे काम का रेंगाळले आहे? याची माहिती घेऊन हे प्राधिकरण ठेवायचे की रद्द करायचे, याचा निर्णय पंधरा दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्दे ‘प्राधिकरणा’संदर्भात पंधरा दिवसांत बैठक घेऊन निर्णय: मुख्यमंत्रीशिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे काम का रेंगाळले आहे? याची माहिती घेऊन हे प्राधिकरण ठेवायचे की रद्द करायचे, याचा निर्णय पंधरा दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.मुंंबई येथील शिवसेना भवन येथे मुख्यमंत्री ठाकरे यांची करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते.यावेळी विराज पाटील म्हणाले, शहराची हद्दवाढ करण्यासाठी तत्कालीन सरकारच्या अट्टाहासाने प्राधिकरण नावाचे भूत ग्रामीण भागाच्या मानगुटीवर बसविण्यात आले. प्राधिकरणाच्या माध्यमातून नियोजनबद्धरीत्या ग्रामीण भागात विकास करण्यात येईल, असा गैरसमज पसरविण्यात आला. परंतु, गेल्या दोन वर्षांत या प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणताही विकास निधी आला नाही, तसेच कोणताही विकास झाला नाही.

सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना बांधकाम परवानगी मिळत नाही. ४२ गावांमध्ये हे प्राधिकरण मंजूर आहे. तेथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचा प्राधिकरणला विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शासनस्तरावर माहिती घेऊन तत्काळ प्राधिकरण रद्द करावे, बांधकाम परवानगीचे अधिकार तसेच बिगर शेती करण्याचे अधिकारी पूर्वीप्रमाणे सर्व तहसीलदारांना देण्यात यावेत. तसेच ग्रामीण कोल्हापूरचा विकास राज्य शासनाने स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निधीतून करण्याबाबतचे आदेश द्यावेत.

यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्राधिकरणासंदर्भात शासनस्तरावर झालेल्या निर्णयाची माहिती, तसेच ते का प्रलंबित आहे? याची माहिती घेतली जाईल असे सांगितले. येत्या पंधरा दिवसांत मंत्रालयात संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राधिकरण ठेवायचे की रद्द करायचे याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूर