शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

स्त्रीवाद, आदिवासी मूल्ये हीच नर्मदा बचाव आंदोलनाची शक्ती- : शिल्पा बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:00 IST

शाश्वत विकासाच्या नावाखाली तुम्ही नद्यांचे पाणी अडवून ठेवाल तर नद्या स्वत: आपला मार्ग शोधतील. त्यावेळी होणारा विध्वंस आणि झालेली अपरिमित हानी न भरून निघणारी असते, हे यंदाच्या महापुरामुळे लक्षात आले असेल.

ठळक मुद्देअजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.
इंदुमती गणेश।नर्मदा नदीवर साकारलेल्या सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्र, गुजरात, आणि मध्य प्रदेशातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. आजतागायत न झालेले पुनर्वसन, शेतीवाडी, घरं या मूलभूत हक्कांसाठी हाती तीर-कमान असलेल्या आदिवासींकडून सुरू असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत... या पार्श्वभूमीवर निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांनी नुकत्याच ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. यानिमित्ताने त्यांची घेतलेली चर्चेतील मुलाखत...प्रश्न : सरदार सरोवर धरण परिसरातील विस्थापितांचे प्रश्न काय आहेत ?उत्तर : नर्मदा नदीवर धरण बांधताना बाधित होणाऱ्या कुटुंबांना विश्वासातच घेतले गेले नाही. ५० हजार कुटुंबांपैकी केवळ ३५ हजार कुटुंबे शासनाच्या पुनर्वसन यादीत आहेत. १६ हजार कुटुंबांना अचानक सांगण्यात आले की, तुमचे पुनर्वसन होणार नाही. धरणात किती पाणीसाठा होतो, हे पाहण्यासाठी यंदा पावसाळ्यात धरणातून पाणीच सोडण्यात आलेले नाही. केवळ साठा वाढविला जात आहे. त्यामुळे गावंच काय, नवीन वसाहतीही पाण्यात बुडाल्या आहेत. वीजनिर्मिती शून्य, त्यांनी वायदा केल्याप्रमाणे कच्छपर्यंत तर पाणीच पोहोचले नाही.प्रश्न : ३५ वर्षे लढा सुरू राहण्यामागचे रहस्य काय?उत्तर : हे खरं आहे की आंदोलन दाबलं जातंय, त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे, सगळ्या बाजूंनी गळचेपी आणि त्यांना कोंडीत पकडले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता असं वाटतंय की नर्मदा बचाव आंदोलन आता संपलं आहे; पण आदिवासींच्या हातात हत्यार असले तरी ते खूप शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहेत. या आंदोलनाचा लोगोही ‘जमिनीत रोवलेला बाण’ असा आहे. या आदिवासींची मूल्यं, मेधातार्इंनी सांभाळलेली धुरा आणि स्त्रीवादाचा प्रभाव हे मला या आंदोलनाच्या यशाचे रहस्य वाटते. अजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.*नर्मदा नदीवर १३५ मध्यम, ३० मोठी व तीन हजार लहान धरणं आहेत.*सर्वांत मोठ्या सरदार सरोवर धरणाची उंची : १३८.६८ मीटर*आलेला खर्च : ६० हजार कोटी रुपये*बुडालेली गावं : महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील २४५ गावं*बुडीत जमीन : ३७ हजार ६९० हेक्टर*विस्थापित नागरिक : ५० हजार कुटुंबे व अडीच लाखांहून अधिक नागरिक*पुनर्वसित झालेली कुटुंबे : ११ हजार
टॅग्स :riverनदीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र