शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

स्त्रीवाद, आदिवासी मूल्ये हीच नर्मदा बचाव आंदोलनाची शक्ती- : शिल्पा बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:00 IST

शाश्वत विकासाच्या नावाखाली तुम्ही नद्यांचे पाणी अडवून ठेवाल तर नद्या स्वत: आपला मार्ग शोधतील. त्यावेळी होणारा विध्वंस आणि झालेली अपरिमित हानी न भरून निघणारी असते, हे यंदाच्या महापुरामुळे लक्षात आले असेल.

ठळक मुद्देअजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.
इंदुमती गणेश।नर्मदा नदीवर साकारलेल्या सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्र, गुजरात, आणि मध्य प्रदेशातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. आजतागायत न झालेले पुनर्वसन, शेतीवाडी, घरं या मूलभूत हक्कांसाठी हाती तीर-कमान असलेल्या आदिवासींकडून सुरू असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत... या पार्श्वभूमीवर निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांनी नुकत्याच ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. यानिमित्ताने त्यांची घेतलेली चर्चेतील मुलाखत...प्रश्न : सरदार सरोवर धरण परिसरातील विस्थापितांचे प्रश्न काय आहेत ?उत्तर : नर्मदा नदीवर धरण बांधताना बाधित होणाऱ्या कुटुंबांना विश्वासातच घेतले गेले नाही. ५० हजार कुटुंबांपैकी केवळ ३५ हजार कुटुंबे शासनाच्या पुनर्वसन यादीत आहेत. १६ हजार कुटुंबांना अचानक सांगण्यात आले की, तुमचे पुनर्वसन होणार नाही. धरणात किती पाणीसाठा होतो, हे पाहण्यासाठी यंदा पावसाळ्यात धरणातून पाणीच सोडण्यात आलेले नाही. केवळ साठा वाढविला जात आहे. त्यामुळे गावंच काय, नवीन वसाहतीही पाण्यात बुडाल्या आहेत. वीजनिर्मिती शून्य, त्यांनी वायदा केल्याप्रमाणे कच्छपर्यंत तर पाणीच पोहोचले नाही.प्रश्न : ३५ वर्षे लढा सुरू राहण्यामागचे रहस्य काय?उत्तर : हे खरं आहे की आंदोलन दाबलं जातंय, त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे, सगळ्या बाजूंनी गळचेपी आणि त्यांना कोंडीत पकडले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता असं वाटतंय की नर्मदा बचाव आंदोलन आता संपलं आहे; पण आदिवासींच्या हातात हत्यार असले तरी ते खूप शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहेत. या आंदोलनाचा लोगोही ‘जमिनीत रोवलेला बाण’ असा आहे. या आदिवासींची मूल्यं, मेधातार्इंनी सांभाळलेली धुरा आणि स्त्रीवादाचा प्रभाव हे मला या आंदोलनाच्या यशाचे रहस्य वाटते. अजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.*नर्मदा नदीवर १३५ मध्यम, ३० मोठी व तीन हजार लहान धरणं आहेत.*सर्वांत मोठ्या सरदार सरोवर धरणाची उंची : १३८.६८ मीटर*आलेला खर्च : ६० हजार कोटी रुपये*बुडालेली गावं : महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील २४५ गावं*बुडीत जमीन : ३७ हजार ६९० हेक्टर*विस्थापित नागरिक : ५० हजार कुटुंबे व अडीच लाखांहून अधिक नागरिक*पुनर्वसित झालेली कुटुंबे : ११ हजार
टॅग्स :riverनदीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र