शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

करारी प्रशासकांचा कामात दरारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्रशासक नियुक्त झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांची कामे होतील की नाही, अशी शंका घेण्यात येत होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : प्रशासक नियुक्त झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांची कामे होतील की नाही, अशी शंका घेण्यात येत होती. प्रस्तापित अधिकाऱ्यांनाही आता आपलेच राज्य येणार असे वाटले होते. तृतीय व चतुर्थश्रेणीचे कर्मचारीही काहीसे ‘आपण करू तीच दिशा’ अशा आविर्भावात होते; परंतु अल्पकाळातच महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी कवाळे यांनी प्रशासनावर वचक तर ठेवालाच, शिवाय त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यावरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

प्रशासक राजवट म्हणजे ‘हम करेसो कायदा’ अशीच प्रवृत्ती असावी असा भास सर्वसामान्य नागरिकांना झाला होता. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात असल्यामुळे नागरिक सहजपणे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना भेटून कामे सांगत होते. अधिकारी त्यास दाद द्यायचे नाहीत. कामात टाळाटाळ करायचे, नागरिकांची दमछाक करायचे. एकेका कामास सहा- सात महिने हेलपाटे मारायला लागायचे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या काळात सुद्धा नागरिकांना लवकर न्याय मिळायला वेळ लागायचा.

जेव्हा महापालिका सभागृहाची मुदत संपली आणि नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आले, तेव्हा प्रशासक आल्यामुळे काही खरे नाही. सर्वसमान्यांना न्याय मिळणार नाही, अशीच शंका शहरवासीयांच्या मनात येत होती. महापालिकेचे प्रस्थापित अधिकारी, कर्मचारी तर लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या त्रासातून मुक्त झाल्यामुळे काहीसे आनंदात होते. आता आपलेच राज्य आहे, असे त्यांना वाटत होते;

पण प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दीड- दोन महिने महापालिकेचा अभ्यास केल्यानंतर काय केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कामे झटपट झाली पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली याची माहिती त्या प्रत्येक आठवड्याला घेतात. जर झाले नाही तर का झाले नाही म्हणून ‘खरपूस’ शब्दात समाचारही घेतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तक्रारींचे प्रमाण शू्न्यावर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

- अशी आहे बलकवडेंची कार्यपद्धत-

नागरिक बुधवार व गुरुवारी तक्रारी घेऊन येतात तेव्हा सर्व विभागाचे प्रमुखांना नजीकच्या मीटिंग हॉलमध्ये बसण्याची सक्ती आहे. नागरिकांचा प्रश्न ज्या विभागाशी आहे, त्यांना बोलावून त्यांच्या समक्ष प्रश्नाचा सोक्षमोक्ष होतो. बऱ्याच वेळा काही नागरिक पूर्व संमतीशिवाय भेटायला येतात. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेऊन चर्चा केली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांना खोटे बोलता येत नाही आणि कामही टाळता येत नाही. प्रशासकांना नागरिक सहजपणे भेटू शकतात.

- रात्रभर काम करायला लावले-

घरफाळा विभागाने थकबाकी वसुलीकरिता योजना लागू केली. दि. १७ फेब्रुवारीस बलकवडे यांनी प्रस्तावावर सही केली; परंतु त्या प्रस्तावावर सहायक आयुक्त कार्यालयाकडून ई गव्हर्नन्स विभागाला दि. २५ जानेवारीपर्यंत सूचनाच गेली नाही. ही बाब लक्षात येताच बलकवडे यांनी सहायक आयुक्तांना तर चांगलेच धारेवर धरले. शिवाय सिस्टीम मॅनेजरना रात्रभर काम करा, उद्यापासून अंमलबजावणी झाली नाही तर ‘याद राखा’ असा दम भरला.