शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

corona virus-‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:29 IST

कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम व्यापारी, बाजारपेठांमधील गर्दी ओसरली; नागरिकांकडून मास्क, रूमालाचा वापर

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.दक्षता म्हणून बहुतांशजण हे मास्क लावूनच दैनंदिन कामे करीत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळत असल्याने आठवड्याचा पहिला दिवस असूनही सोमवारी शहरातील प्रमुख व्यापारीपेठा, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, महाद्वाररोड, आदी परिसरात तुरळक गर्दी दिसून आली.विविध विभागांची शासकीय कार्यालयाने सुरू असल्याने रविवारपेक्षा शहरातील रस्त्यांवरील गर्दी वाढल्याचे दिसली, पण ती नेहमीच्या तुलनेत कमीच होती. बिंदू चौक, शिवाजी रोड, महाद्वाररोड, शाहूपुरी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, गुजरी, पापाची तिकटी, आदी परिसरातील अनेक दुकानांमध्ये काहीसा शुकशुकाट दिसून आला.उद्याने, बगीचे आणि रेल्वेस्थानक परिसरात कमी गर्दी दिसून आली. दक्षता म्हणून अधिकतर नागरिक हे मास्क अथवा तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडत आहेत. काहींनी, तर घरात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचेही प्रमाण घटले आहे.भीतीपोटी मंडईत गर्दीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस भाजी मिळणार नसल्याची भीती नागरिकांमध्ये असल्याने त्यांची मंडईमध्ये सोमवारीही गर्दी झाली. मंडईत रविवारी नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी होती आणि ती बऱ्याच वर्षांनंतर झाली. भाज्यांची आवक चांगली आहे. दरात वाढ झाल्याची अफवा असल्याचे कपिलतीर्थ मंडईतील भाजी विक्रेते सागर करीगार यांनी सांगितले.रिक्षाचालकांना प्रतीक्षालोकांनी घराबाहेर पडणे बंद केल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आज, जरा चांगली स्थिती आहे. मात्र, नंबर येण्यासाठी दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सीबीएस स्टँड परिसरातील रिक्षाचालक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.

घरी जाण्याची घाईशिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये दि. ३१ मार्चंपर्यंत वर्ग भरणार नाहीत. त्यामुळे वसतिगृह, कॉटबेसेसवर राहणारे विद्यार्थी, विद्यार्थिनींची आपल्या गावी, घरी जाण्यासाठी घाई सुुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गर्दी झाली.

दुकाने दुपारी बंदगेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांचे घटलेले प्रमाण आणि उन्हाचा तडाखा यामुळे शहरातील विविध भागांतील काही व्यावसायिकांनी दुपारी दोन ते तीन तास दुकाने बंद ठेवली. ‘कोरोना’मुळे लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारात शांतता असल्याचे चप्पल व्यावसायिक दीपक खांडेकर यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर