शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

corona virus-‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:29 IST

कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम व्यापारी, बाजारपेठांमधील गर्दी ओसरली; नागरिकांकडून मास्क, रूमालाचा वापर

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.दक्षता म्हणून बहुतांशजण हे मास्क लावूनच दैनंदिन कामे करीत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळत असल्याने आठवड्याचा पहिला दिवस असूनही सोमवारी शहरातील प्रमुख व्यापारीपेठा, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, महाद्वाररोड, आदी परिसरात तुरळक गर्दी दिसून आली.विविध विभागांची शासकीय कार्यालयाने सुरू असल्याने रविवारपेक्षा शहरातील रस्त्यांवरील गर्दी वाढल्याचे दिसली, पण ती नेहमीच्या तुलनेत कमीच होती. बिंदू चौक, शिवाजी रोड, महाद्वाररोड, शाहूपुरी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, गुजरी, पापाची तिकटी, आदी परिसरातील अनेक दुकानांमध्ये काहीसा शुकशुकाट दिसून आला.उद्याने, बगीचे आणि रेल्वेस्थानक परिसरात कमी गर्दी दिसून आली. दक्षता म्हणून अधिकतर नागरिक हे मास्क अथवा तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडत आहेत. काहींनी, तर घरात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचेही प्रमाण घटले आहे.भीतीपोटी मंडईत गर्दीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस भाजी मिळणार नसल्याची भीती नागरिकांमध्ये असल्याने त्यांची मंडईमध्ये सोमवारीही गर्दी झाली. मंडईत रविवारी नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी होती आणि ती बऱ्याच वर्षांनंतर झाली. भाज्यांची आवक चांगली आहे. दरात वाढ झाल्याची अफवा असल्याचे कपिलतीर्थ मंडईतील भाजी विक्रेते सागर करीगार यांनी सांगितले.रिक्षाचालकांना प्रतीक्षालोकांनी घराबाहेर पडणे बंद केल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आज, जरा चांगली स्थिती आहे. मात्र, नंबर येण्यासाठी दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सीबीएस स्टँड परिसरातील रिक्षाचालक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.

घरी जाण्याची घाईशिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये दि. ३१ मार्चंपर्यंत वर्ग भरणार नाहीत. त्यामुळे वसतिगृह, कॉटबेसेसवर राहणारे विद्यार्थी, विद्यार्थिनींची आपल्या गावी, घरी जाण्यासाठी घाई सुुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गर्दी झाली.

दुकाने दुपारी बंदगेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांचे घटलेले प्रमाण आणि उन्हाचा तडाखा यामुळे शहरातील विविध भागांतील काही व्यावसायिकांनी दुपारी दोन ते तीन तास दुकाने बंद ठेवली. ‘कोरोना’मुळे लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारात शांतता असल्याचे चप्पल व्यावसायिक दीपक खांडेकर यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर