शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिरोळमधील कॅन्सरची भीती अवास्तव-३ लाख १० हजारपैकी केवळ १४४० संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:28 IST

शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे.

ठळक मुद्देआधुनिक साधनांचा वापर करण्यात येणार असून यातून कॅन्सरग्रस्तांचा नेमका आकडा समोर येणार गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना कॅन्सरची लागण झाल्याची चर्चा

- समीर देशपांडेकोल्हापूर : शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण असल्याची भीती अवास्तव असल्याची आकडेवारी समोर येत असून आतापर्यंत ३ लाख १० हजार ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १४४० जणांची ‘संशयित’ म्हणून नोंदणी करण्यात आली आली आहे. येत्या महिनाभरात या सर्वांची सविस्तर तपासणी झाल्यानंतर हा आकडा आणखी मोठ्या प्रमाणावर खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना कॅन्सरची लागण झाल्याची चर्चा आहे, अशा पद्धतीच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले. सर्वच लोकप्रतिनिधींही ही बाब गांभीर्याने घेतली. परिणामी गेल्यावर्षी जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला २७ लाख ८० हजारांचा निधी देत या ठिकाणी सर्वेक्षणाच्या सूचना केल्या.

त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपूर्वी हे सर्वेक्षण झाले. जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वगळता उर्वरित ३ लाख १० हजार महिला, पुरुष ग्रामस्थांची आशांनी जावून तपासणी केली आहे. त्यामध्ये १४४० जण ‘कॅन्सरचे संशयित’ म्हणून नोंद करण्यात आले आहेत. २९० आशांनी हे काम केले आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते.

आता येत्या महिनाभरामध्ये शिरोळ तालुक्यात पाच ठिकाणी तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून त्यामध्ये कॅन्सरतज्ज्ञांना बोलावून या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यात येणार असून यातून कॅन्सरग्रस्तांचा नेमका आकडा समोर येणार आहे.

कॅन्सर रुग्णांची संख्या शिरोळ तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढली असून त्यासाठी रासायनिक शेती आणि भाजीपाल्यांवर केली जाणारी औषधांची फवारणी कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. दरम्यान, कृषिअभ्यासक अजित नरदे यांनी कॅन्सरची भीती अवास्तव असून सेंद्रीय शेती करणाऱ्यांनी हा बागुलबुवा उभा केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतातया सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामस्थांना अंगावर गाठी आहेत का, याची विचारणा करण्यात आली. अनेकांनी गाठी असल्याचे सांगितले. मात्र, या सर्वच गाठी कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे संशयितांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर तपासणी झाल्यानंतरच त्याचा आकडा निश्चित होईल, असे ते म्हणाले.‘टाटा’कडूनही तपासणीटाटा कॅन्सर रिसर्च सेंटरनेही शिरोळ तालुक्यातील १३ गावांचे सर्वेक्षण केले असून त्यामध्येही जेवढी चर्चा सुरू आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची गरज आहेशिरोळ तालुक्यातील या कॅन्सरच्या भीतीची सर्वच लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. अगदी परवा जिल्ह्याच्या दौºयावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आमदार उल्हास पाटील यांच्याकडे याबाबत चौकशी केली. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने याबाबतची तपासणी शिबिरे घेऊन त्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. 

 

टॅग्स :cancerकर्करोगkolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी