शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

शिरोळ तालुक्यातील कॅन्सरची भीती अनाठायी¨; सूरज पवार : जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:16 IST

कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे,

कोल्हापूर : कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. सूरज पवार यांनी सोमवारी (दि. २) येथे केले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे आयोजित ‘कॅन्सर-समज व गैरसमज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर होते. डॉ. पवार म्हणाले, कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगातील इंग्लंड, अमेरिका, आदी देशांमध्ये झालेल्या संशोधनात कुठेही सिद्ध झालेले नाही. जगभरातील ९० टक्के शोधनिबंधांमध्ये याबाबत स्पष्टता नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत असल्याचा शास्त्रीय, ठोस पुरावा नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. शिरोळ तालुक्यामध्ये खरोखर कॅन्सरचे प्रमाण जादा असल्याचे आणि त्याला कीटकनाशकाचा अतिवापर कारणीभूत असल्याचा शास्त्रीय पुरावा नाही. याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिरोळमधील कॅन्सरचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लोकसंख्येवर आधारित आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

डॉ. सुभाष आठले म्हणाले, कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधित संभाव्य यादीत कीटकनाशकांचा अंतर्भाव नाही. प्रमाणाबाहेर कीटकनाशके पोटात गेली, तर त्याचे अन्य दुष्परिणाम आहेत. पण, पिकांवर कीटकनाशके वापरली म्हणून कॅन्सर होतो हे म्हणणे चुकीचे आहे.

उलट कीटकनाशकांमुळे भारतात हरितक्रांती झाली. ज्येष्ठ वनस्पतिशास्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर म्हणाले, विकास साधण्याबरोबरच पर्यावरणाचा तोल सांभाळला जावा.या चर्चासत्रास प्रभाकर मायदेव, सचिन घाटगे, सुधीर हंजे, बृहस्पती शिंदे, आदी उपस्थित होते. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी आभार मानले.लवकरच विशेष तपासणी मोहीमकोल्हापूर कॅन्सर सेंटरकडे नोंद झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता शिरोळ तालुक्यातून येणाºया रुग्णसंख्येत वाढ असल्याचे आढळून येत नसल्याचेडॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि जिल्हा परिषदेतर्फे शिरोळ तालुक्यात कॅन्सरबाबतची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणMedicalवैद्यकीय