शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील कॅन्सरची भीती अनाठायी¨; सूरज पवार : जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:16 IST

कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे,

कोल्हापूर : कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. सूरज पवार यांनी सोमवारी (दि. २) येथे केले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे आयोजित ‘कॅन्सर-समज व गैरसमज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर होते. डॉ. पवार म्हणाले, कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगातील इंग्लंड, अमेरिका, आदी देशांमध्ये झालेल्या संशोधनात कुठेही सिद्ध झालेले नाही. जगभरातील ९० टक्के शोधनिबंधांमध्ये याबाबत स्पष्टता नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत असल्याचा शास्त्रीय, ठोस पुरावा नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. शिरोळ तालुक्यामध्ये खरोखर कॅन्सरचे प्रमाण जादा असल्याचे आणि त्याला कीटकनाशकाचा अतिवापर कारणीभूत असल्याचा शास्त्रीय पुरावा नाही. याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिरोळमधील कॅन्सरचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लोकसंख्येवर आधारित आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

डॉ. सुभाष आठले म्हणाले, कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधित संभाव्य यादीत कीटकनाशकांचा अंतर्भाव नाही. प्रमाणाबाहेर कीटकनाशके पोटात गेली, तर त्याचे अन्य दुष्परिणाम आहेत. पण, पिकांवर कीटकनाशके वापरली म्हणून कॅन्सर होतो हे म्हणणे चुकीचे आहे.

उलट कीटकनाशकांमुळे भारतात हरितक्रांती झाली. ज्येष्ठ वनस्पतिशास्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर म्हणाले, विकास साधण्याबरोबरच पर्यावरणाचा तोल सांभाळला जावा.या चर्चासत्रास प्रभाकर मायदेव, सचिन घाटगे, सुधीर हंजे, बृहस्पती शिंदे, आदी उपस्थित होते. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी आभार मानले.लवकरच विशेष तपासणी मोहीमकोल्हापूर कॅन्सर सेंटरकडे नोंद झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता शिरोळ तालुक्यातून येणाºया रुग्णसंख्येत वाढ असल्याचे आढळून येत नसल्याचेडॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि जिल्हा परिषदेतर्फे शिरोळ तालुक्यात कॅन्सरबाबतची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणMedicalवैद्यकीय