शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:40 IST

आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेरशहापूरमधील प्रकार : कोल्हापुरातील बालगृहात प्रवेश

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.घडले ते असे : शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्यात नमूद माहितीनुसार आई आणि वडील यांच्यात सातत्याने वाद होत होते. वडिलांकडून आईला शिवीगाळ आणि मारहाण होणे हे पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलाला सहन होत नव्हते. अखेर मुलाने या भांडणात मध्यस्थी करत समजावण्याचा प्रयत्न केला परंतु जन्मदात्यांना ही मध्यस्थी पचनी पडली नाही. वडिलांना त्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी मुलालाच घराबाहेर काढले.

गेले काही महिने हा मुलगा शेजारच्या कारखान्यात एकटा राहतो. आई मात्र या मुलाला सकाळ-संध्याकाळचे जेवण पाठवत असे. इथूनच या मुलाचे शिक्षण सुरू होते. ही अवस्था न पाहवल्यामुळे भावकीतील काही लोकांनी शहापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलास संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांकडून तसे घडले नाही.बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम १०७ अन्वये प्रत्येक पोलिस ठाण्यात 'बाल कल्याण पोलीस अधिकारी' कार्यरत असतो. कोल्हापूर जिल्ह्यात अधिकृतपणे प्रत्येक पोलीस ठाण्यात असा बाल कल्याण पोलीस अधिकारी कार्यरत आहे. त्याअर्थी शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची या प्रकरणातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे, तर या अधिकाºयाने या प्रकरणात कोणती भूमिका घेतली हे स्पष्ट होण्याची गरज आहे.या प्रकरणातील कांही अनुत्तरित प्रश्र्न१) जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला नको का?२) जन्मदात्यांनी जन्म दिला म्हणजे त्या जीवाचं जगणं किंवा त्याला मारणं हा त्यांचा अधिकार आहे असे समजणे कितपत योग्य आहे? (बाल हक्क संहितेनुसार प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे)३) पोलिसांनी या मुलाच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही का केली नाही?४) प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी नियुक्त केला नसल्यास त्याची कार्यवाही केव्हा केली जाणार?५) कुटुंबातूनच मुलांना सुरक्षितता लाभत नसेल आणि पोलिसांसारखी यंत्रणाही दुर्लक्ष करीत असेल तर बाल हक्कांची जबाबदारी कुणाची?

अशा प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. या मुलांना जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी कायदेशीर व्यवस्था आहे परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव या प्रकरणात आला आहे.अतूल देसाईबालकल्याण क्षेत्रातील कार्यकर्ते

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर