शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:24 IST

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा ...

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांचा सरकारला इशारा कायदा असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नाहीआणखी चार कारखाने रडारवर!

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

संघटनांमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. हे मान्य करीत मुश्रीफ म्हणाले, ऊस दरासाठी सरकारने एफआरपी आणि उत्पन्नावर आधारित ७० : ३० व ७५ : २५ फॉम्युल्यानुसार अंतिम दर देणे बंधनकारक केले आहे. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांकडून भागभांडवल गोळा करून कारखाने उभे करायचे आणि दर मात्र हे ठरविणार, हे आता चालणार नाही.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कागल परिसरातून ५० हजार टन तर चंदगड, आजरा परिसरांतून ३० हजार टन ऊस गेला आहे. आम्ही कारखाने कसे चालवायचे? तो ऊस संघटनेने का अडविला नाही.

कायद्याने दर देणे बंधनकारक असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड केली. यावर्षी एफआरपीमध्ये ३00 रुपयांची वाढ झाल्याने बॅँकांची उचल व एफआरपी देतानाच अनेकांची दमछाक होणार आहे. काही कारखानदार त्यांच्याशी सामील होऊन दर जाहीर करीत असेल तर जरूर करू देत, असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी चार कारखाने रडारवर!जिल्हा बॅँकेने नियम सोडून कर्ज दिल्याने चार कारखाने सुरू झाले. गत हंगामात जानेवारीत धुराडी बंद पडली. कामगारांना दहा महिने बसून पगार द्यावा लागला. ‘सब घोडे बारा टक्के’ यामुळे ‘पंचगंगा’, ‘गायकवाड’, ‘दौलत’, ‘इंदिरा’ हे कारखाने दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. ‘दत्त-आसुर्ले’ विक्रीस निघाला. आणखी चार ते पाच कारखाने रडारवर आहेत. कारखाने वाचले तर शेतकºयांना चांगले पैसे देता येतील, याचे भान संघटनेने ठेवावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शेट्टी सांगतील तोच कायदा कराकायद्यापेक्षा कोणी स्वत:ला श्रेष्ठ समजत असतील तर ते आता खपवून घेणार नाही. कारखान्यांना संरक्षण द्यायला जमत नसेल तर कायदे मोडून राजू शेट्टी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत सांगतील तोच दर, असे एकदा सरकारने आम्हाला सांगावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

काळे-पांढरे बोके कोठे गेले?मध्यंतरी दूध दराच्या आंदोलनात ‘गोकुळ’ला टार्गेट करून ‘पांढºया दुधातील काळे बोके’ अशी टीका केली. स्वत:चा ‘स्वाभिमानी’ दूध संघ काढला; पण इतरांपेक्षा किती जादा दर दिला? कोठे गेले ‘काळे-पांढरे बोके? असा सवाल करीत शेट्टी यांनी एखादा कारखाना चालविण्यास घेऊन दर द्यावा म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘आजरा’ ला परमेश्वरच वाचवू शकतोगत हंगामात आजरा कारखान्याकडे जिल्हा बॅँकेसह इतर बॅँकांची ३१ कोटी ३४ लाखांची कर्जे आहेत. यातील एक रुपयाची परतफेड झालेली नाही. वाढीव एफआरपी पाहता साखरेच्या दरात थोडी जरी घसरण झाली तरी ‘आजरा’ कारखान्याला परमेश्वरच वाचवू शकेल, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी ताळेबंद मांडल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफFarmerशेतकरी