शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:24 IST

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा ...

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांचा सरकारला इशारा कायदा असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नाहीआणखी चार कारखाने रडारवर!

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

संघटनांमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. हे मान्य करीत मुश्रीफ म्हणाले, ऊस दरासाठी सरकारने एफआरपी आणि उत्पन्नावर आधारित ७० : ३० व ७५ : २५ फॉम्युल्यानुसार अंतिम दर देणे बंधनकारक केले आहे. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांकडून भागभांडवल गोळा करून कारखाने उभे करायचे आणि दर मात्र हे ठरविणार, हे आता चालणार नाही.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कागल परिसरातून ५० हजार टन तर चंदगड, आजरा परिसरांतून ३० हजार टन ऊस गेला आहे. आम्ही कारखाने कसे चालवायचे? तो ऊस संघटनेने का अडविला नाही.

कायद्याने दर देणे बंधनकारक असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड केली. यावर्षी एफआरपीमध्ये ३00 रुपयांची वाढ झाल्याने बॅँकांची उचल व एफआरपी देतानाच अनेकांची दमछाक होणार आहे. काही कारखानदार त्यांच्याशी सामील होऊन दर जाहीर करीत असेल तर जरूर करू देत, असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी चार कारखाने रडारवर!जिल्हा बॅँकेने नियम सोडून कर्ज दिल्याने चार कारखाने सुरू झाले. गत हंगामात जानेवारीत धुराडी बंद पडली. कामगारांना दहा महिने बसून पगार द्यावा लागला. ‘सब घोडे बारा टक्के’ यामुळे ‘पंचगंगा’, ‘गायकवाड’, ‘दौलत’, ‘इंदिरा’ हे कारखाने दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. ‘दत्त-आसुर्ले’ विक्रीस निघाला. आणखी चार ते पाच कारखाने रडारवर आहेत. कारखाने वाचले तर शेतकºयांना चांगले पैसे देता येतील, याचे भान संघटनेने ठेवावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शेट्टी सांगतील तोच कायदा कराकायद्यापेक्षा कोणी स्वत:ला श्रेष्ठ समजत असतील तर ते आता खपवून घेणार नाही. कारखान्यांना संरक्षण द्यायला जमत नसेल तर कायदे मोडून राजू शेट्टी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत सांगतील तोच दर, असे एकदा सरकारने आम्हाला सांगावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

काळे-पांढरे बोके कोठे गेले?मध्यंतरी दूध दराच्या आंदोलनात ‘गोकुळ’ला टार्गेट करून ‘पांढºया दुधातील काळे बोके’ अशी टीका केली. स्वत:चा ‘स्वाभिमानी’ दूध संघ काढला; पण इतरांपेक्षा किती जादा दर दिला? कोठे गेले ‘काळे-पांढरे बोके? असा सवाल करीत शेट्टी यांनी एखादा कारखाना चालविण्यास घेऊन दर द्यावा म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘आजरा’ ला परमेश्वरच वाचवू शकतोगत हंगामात आजरा कारखान्याकडे जिल्हा बॅँकेसह इतर बॅँकांची ३१ कोटी ३४ लाखांची कर्जे आहेत. यातील एक रुपयाची परतफेड झालेली नाही. वाढीव एफआरपी पाहता साखरेच्या दरात थोडी जरी घसरण झाली तरी ‘आजरा’ कारखान्याला परमेश्वरच वाचवू शकेल, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी ताळेबंद मांडल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफFarmerशेतकरी