शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

कोल्हापूर : पन्हाळा, मलकापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 17:16 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे.

ठळक मुद्दे‘रोहयो’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवडसामाजिक वनीकरण विभागाकडून कार्यवाही सुरू

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे. या ठिकाणी यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी रोपे लावली जाणार आहेत.या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसाहाय्य योजनेतील लहान व सीमांतभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये इच्छुक लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आले.इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे. यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करतील.

जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव एकत्रित करून ते मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतर विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.या योजनेंतर्गत १ जून ते १३ डिसेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावरील हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

असे असले तरी सामाजिक वनीकरण विभागाने राज्याच्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात या योजनेचा समाविष्ट केला आहे. त्यामुळे १ ते ३१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर रोपे लावली जाणार आहे. या योजनेसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी याबाबत माहिती घेत आहेत.

पन्हाळा, मलकापुरातील ३१२ एकर जमीन निश्चितशेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड या योजनेंतर्गत पन्हाळा व मलकापूर येथील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पन्हाळा येथील ६२ एकर व मलकापूर येथील २५० एकर जमीन यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी रोपे लावण्याचे काम १ जुलैच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी होणार आहे.

‘रोहयो’अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून याबाबत विचारणा होत आहे. पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर क्षेत्र यासाठी निश्चित झाले आहे. यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात या ठिकाणी रोपे लावली जातील.-दीपक खाडे,विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, कोल्हापूर.

 

टॅग्स :forest departmentवनविभागgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर