काजू दराबाबत शेतकऱ्यांनी संयम राखा; बळिराजा संघटनेचे आवाहन
चंदगड : काजूची मूळ किंमत व उत्पादन खर्च यांची सांगड घातल्यास यंदा काजूचा दर किमान १६० रुपये मिळाला पाहिजे. यासाठी नियोजनबद्धरीत्या विभागवार बैठकांचे नियोजन चालू आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कुणाच्याही दबावाला बळी न पडता काजू विक्री करू नये, संयम पाळावा, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी केले.
काजू दराबाबत अडकूर विभागातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित दौऱ्यामध्ये ते अलबादेवी (ता. चंदगड) येथे शेतकऱ्यांशी बोलत होते.
काजू उत्पादक श्रीकांत नेवगे यांनी स्वागत करून यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्याने दराबाबत कोणतीही तडजोड करायची नाही.
नितीन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी काजू दरवाढीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेने व्यापक लढा उभा केला आहे. तालुक्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी परसू गावडे (हिंडगाव), सतीश भोसले, पोलीस पाटील आनंद पाटील, उपसरपंच राजाराम पाडले, उपसरपंच खंडेराव देसाई (उत्साळी), संजय पाडले, यशवंत घोळसे, रघुनाथ कोले, संदीप देसाई, कृष्णा भादवणकर, प्रशांत सांवत, शशीकांत दोरुगडे, गोविंद गोते, सचिन पाटील, पुंडलिक कांबळे, मारुती कुडाळकर, शिवाजी पाटील, वसंत देवळे, महादेव पाटील, पांडुरंग पवार, दत्तू दोरूगडे, निवृत्ती कोले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.