शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:01 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

ठळक मुद्देमहावितरणच्या झटक्याने कोगे विभागातील शेतकरी हैराण ठरवून दिलेल्या विजेच्या तासात अचानक कपात

कोल्हापूर : महावितरणच्या कोगे (ता. करवीर) उपविभागीय कार्यालयाच्या झटक्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. एकतर आठवड्यातून चार दिवसच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जातो. त्यातही तासभर अगोदर वीज गायब होत आहे. अगोदरच उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिके करपू लागली असताना महावितरणच्या करामतीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, ही गेली अनेक वर्षे मागणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे जोखमीचे ठरत आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. तरीही महावितरण तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा करते.

दिवसा वीजपुरवठा करताना त्यातही कमी दाबाने पुरवठा करणे, मध्यंतरी वीज गायब होण्याच्या तक्रारी आहेत. कोगे महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शनिवारी सकाळी ८.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. मुळात आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे यामधील पाच-दहा मिनिटे वेळही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मात्र, शनिवारी (दि. ६) निर्धारित वेळेच्या अगोदरच वीज बंद केली गेली. असे वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही तांत्रिक कारणामुळे तासभर अगोदर वीज बंद होत असेल तर दुसऱ्या दिवशी तेवढा कालावधी वाढवून देणे महावितरणास बंधनकारक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

महावितरणच्या कोगे कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेती पंपांबाबत असा प्रकार सातत्याने होत आहे. याची चौकशी होऊन शेतकऱ्यांना विनाखंडित वीजपुरवठा करावा.- संजय जोतिराम पाटील ,शेतकरी, वाकरे

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर