शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

शेतकरी ‘सन्मान’ कसला ‘अडवणूक’च : राज्यातील लाखो पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 11:24 IST

तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.

ठळक मुद्दे ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.

राजाराम लोंढेकोल्हापूर : महायुतीच्या सरकारने जून २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी आणली; पण गेली अडीच वर्षे या कर्जमाफीचे गु-हाळ सुरू आहे. राज्यातील लाखो पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, गेली चार महिने याद्या अपलोड प्रणालीच बंद आहे. ही कर्जमाफी अधांतरीच असताना, पश्चिम महाराष्टतील महापुरात बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली, पूर ओसरून चार महिने उलटले तरी अद्याप दमडीही मिळालेली नाही. तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जून २०१७ मध्ये राज्यातील मार्च २०१६ पूर्वीचे दीड लाखापर्यंतची थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ या नावाने कर्जमाफी सुरू केली; पण निकष, ‘पिवळी’, ‘लाल’ व ‘हिरवी’ याद्यांच्या घोळांमुळे गेली अडीच वर्षे कर्जमाफीचे गु-हाळ सुरू आहे. याद्यांतील घोळातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तालुकास्तरीय समित्या नेमल्या. समितीने तांत्रिक त्रुटी दूर करून पात्र शेतक-यांच्या याद्या अपलोड केल्या.

सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाले; मात्र एक दमडीही शेतकºयांना मिळालेली नाही. राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. गेली चार महिने याद्या अपलोड करणारी प्रणालीच बंद असल्याने सगळी यंत्रणाच ठप्प झाली आहे.

जुलै-आॅगस्ट महिन्यांत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत महापुराने शेती उद्ध्वस्त केली. तत्कालीन महायुतीच्या सरकारने पूरबाधित शेतकºयांचे उभ्या पिकावर उचल केल्याने कर्जमाफीची घोषणा केली. महसूल यंत्रणेने पंचनामे केले, महापूर ओसरून चार महिने उलटले तरी ही रक्कम अद्याप सरकारी तिजोरीतच आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्टÑ विकास आघाडी सरकारमध्ये कर्जमाफीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पहिल्या दोन कर्जमाफींचे गुºहाळ सुरू असतानाच आता तिसरी कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तीन वर्षांत तिसरी कर्जमाफी असून, सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याने अगोदरच्या कर्जमाफ्या अयशस्वी ठरल्या, किमान ही तरी कर्जमाफी शेतकºयांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी.ढीगभर निकषांमुळे लाभापेक्षा मनस्तापच अधिककर्जमाफीसाठी ढीगभर निकष राहिल्याने ती राबवायची कशी? असा पेच सरकारी यंत्रणेसमोर होता. त्यातूनच पात्र, अपात्र याद्यांचा घोळ शेवटपर्यंत राहिला; त्यामुळे कर्जमाफीच्या लाभापेक्षा शेतकºयांना मनस्तापच अधिक झाला.कोल्हापुरातील ४१ हजार शेतकरी प्रतीक्षेतकोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार खातेदारांना ३३६ कोटी ७९ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.विभागातील १.४२ लाख शेतक-यांना कर्जमाफी शक्यकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील २०१९ च्या खरीप हंगामात एक लाख ४२ हजार ५०६ शेतकरी थकबाकीदार आहेत. नवीन सरकारने सरसकट कर्जमाफी दिली, तर या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.शिवाजी महाराज कर्जमाफी योजना -मार्च २०१६ पूर्वीची दीड लाखापर्यंतची सर्व कर्जमाफीदीड लाखावरील थकीत कर्जासाठी ‘ओटीएस’ योजना. वरील रक्कम भरली तरच दीड लाखाची कर्जमाफी.

  • एप्रिल २०१६ नंतर उचल केलेल्या पीक कर्जावर २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान.

     

    टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfloodपूरGovernmentसरकार