कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीचे सांडपाणी शेतात जात असून, शेतीचे नुकसान होत असल्याने ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे नियोजन करावे, या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी येथील ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषणाला आज, सोमवारी प्रारंभ केला.महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून महावीर चौगुले, मल्लय्या स्वामी, अण्णासो चौगुले, अक्षय पाटील, शाहीर बाणदार हे शेतकरी उपोषणाला बसले आहेत.निवेदनात म्हटले आहे, गावातील सांडपाणी पूर्वीपासून रस्त्याच्या पूर्व बाजूने चरीमधून जात असताना काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे शिरोळचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी काढण्याचा निर्णय दिला होता. मात्र, पश्चिम बाजूची शेती गटारीपेक्षा खोलगट असल्याने ग्रामपंचायत व अधिकारी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सांडपाणी पश्चिम बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ग्रामपंचायतीने पूर्वीपासून वाहत जात असलेल्या चरीची खोली करून पाणी काढून देण्याची मागणी केली आहे.
शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: January 14, 2015 00:36 IST