शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:32 IST

आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देपेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण : मृग नक्षत्राला प्रारंभ, पण पावसाचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. वाढत्या तापमानाने शेतकरीवर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.शेतकरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडयापासून शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यात व्यस्त असतो. यावेळी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. सूर्याचा पारा सातत्याने ४५ अंशापार जात राहिला. तरीही शेतकऱ्यांनी उसंत घेतली नाही. परंतु यावर्षी मृग नक्षत्र लागला तरी पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने तापमान कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाला. परंतु सदर नक्षत्र अत्यंत तप्त आणि कोरडा गेल्याने आजपासून लागणाऱ्या मृग नक्षत्राकडे शेतकºयांच्या नजरा लागून आहेत. आतातरी पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे टक लावून बघत आहे. परंतु आकाश निरभ्र दिसत असून सूर्याचे आग ओकणेही सुरूच आहे, त्यामुळे शेतकरी काहिसा चिंताग्रस्त झाला आहे. रोहिणी नक्षत्राने शेतकºयांना हुलकावणी दिल्याने तसेच उन्हाचा तडाखा अजूनही सुरूच असल्याने पुढे कशी स्थिती राहील, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.पूर्वीच्या काळी शेतकरी घरातील पारंपरिक बि-बियाण्यांचा वापर करीत असे. परंतु बदलत्या काळाच्या ओघात काही वर्षांपासून पेरणीसाठी संकरित बि-बियाण्यांचा वापर करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या बि-बियाणे, खते यांची जमवाजमव सुरू असून आवश्यक तयारीत शेतकरी गुंतला आहे. तालुक्यात सर्वत्र भातपिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. भात पेरणीपूर्वी मशागतीसाठी बहुसंख्य शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर ट्रील यांना प्राधान्य देत असतात. या यंत्राद्वारे मशागतीची कामे पूर्ण झाली असून पावसाची प्रतीक्षा आहे.उन्हाळी पीक निघालेब्रह्मपुरी तालुक्यात अनेक शेतकºयांनी उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. आता हा हंगाम संपला असून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक काढले आहे. आता हेच शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.कृषी केंद्र ओसमृग नक्षत्र लागूनही पावसाचा अजूनही थांगपत्ता नसल्याने तसेच पावसाचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने शेतकºयांनी बि-बियाण्यांच्या व खतांच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तालुक्यातील कृषी केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती