शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

ऊसबिलासाठी शेतकरी पुन्हा आक्रमक, प्रशासनाकडून मध्यस्थी : ५ सप्टेंबरपूर्वी बिले देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:02 IST

साखरवाडी येथील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासंदर्भात ऊसउत्पादक शेतकरी शुक्रवारी पुन्हा आक्रमक झाले. कारखाना प्रशासनाने ५ सप्टेंबरपूर्वी ऊसबिल देण्याचे लेखी आश्वासन दिले.

ठळक मुद्दे न्यू फलटण शुगर वर्क प्रशासनाचे आश्वासन

फलटण : साखरवाडी येथील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासंदर्भात ऊसउत्पादक शेतकरी शुक्रवारी पुन्हा आक्रमक झाले. कारखाना प्रशासनाने ५ सप्टेंबरपूर्वी ऊसबिल देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ते तात्पुरते स्थगित केले. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने आंदोलक शांत झाले.

साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने २०१७-१८ या कालावधीत गळीतासाठी आलेल्या उसाचे पैसे न दिल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले. व्यवस्थापनाकडून वारंवार केवळ आश्वासने मिळत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. हा असंतोष गुरुवारी तहसीलदार कार्यालय झालेल्या बैठकीत उफाळून आला.

ऊस उत्पादक शेतकºयांनी उसाचे पैसे मिळाल्याशिवाय आणि संचालकाविरोधात गुन्हे दाखल केल्याशिवाय न उठण्याचा पवित्रा घेत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला होता. काहींनी आत्महत्येचा इशारा दिल्याने वातावरण तंग झाले होते. तहसीलदार विजय पाटील यांनी दूरध्वनीवरून प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी ऊसउत्पादक आंदोलनसंदर्भात चर्चा केली. साळुंखे-पाटील यांनी शुक्रवारी संचालकांना चर्चेसाठी पाठवून देतो आणि कधी पेमेंट कधी मिळणार, हे लेखी स्वरुपात देतो, असे सांगितल्यावर आंदोलक शांत झाले होते.

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात ऊसउत्पादक शेतकरी जमले. संचालक धनंजय साळुंखे-पाटील हे तहसील कार्यालयात आले. यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी धनंजय पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलकांच्या भावना सांगितल्या.त्यानंतर सर्वजण बाहेरच्या आवारात ऊस उत्पादकांच्या सामोरे गेले.

यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना कारखान्याने ५ सप्टेंबरच्या आत बिले देतो, असे आम्हाला सांगितले आहे. असे स्पष्ट करतानाच त्यांनी जर उसाचे पेमेंट केले नाही तर कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसिस जमीन आदी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला.

धनंजय साळुंखे-पाटील म्हणाले, ‘कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकºयांचे पैसे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. कारखाना अडचणीत असल्याने आम्ही बरेच पर्याय शोधले; पण अनेक वेळा अडचणी आल्यामुळे उसाचे पेमेंट करता आले नाही.’

फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांनी पाच तारखेपर्यंत आंदोलन मागे घेत आहोत. या वेळेत उसाचे पेमेंट मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील..शेतकºयांची देय असलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत ५ सप्टेंबरच्या आत देणार आहोत. कारखाना व्यवस्थापन यासाठी प्रयत्नशील असून, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आणि व्यक्तींशी या संदर्भात बोलणे सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेवर पेमेंट न मिळाल्याने त्यांना आलेल्या अडचणीची आम्हाला जाणीव आहे,’ असे धनंजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तहसील कार्यालय परिसरात शुक्रवारी संतप्त ऊस उत्पादक शेतकरी जमा झाले होते. त्यांच्या प्रश्नांना धनंजय साळुंखे-पाटील यांनी उत्तरे दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMorchaमोर्चा