शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त; पण कोल्हापूर जिल्हा बॅँक अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:23 IST

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केल्याची प्रमाणपत्रे वाटली. त्यांच्या खात्यावर जमाखर्च करण्याचे आदेश जिल्हा बॅँकांना दिले; पण त्याचे पैसे अद्याप बॅँकेला मिळाले नाहीत. जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांचा ११ लाख ८४ हजारांचा जमाखर्च कागदोपत्री झाला आहे.

ठळक मुद्देसत्कार केलेल्या २७ शेतकऱ्यांचे अद्याप पैसेच नाहीतकिती शेतकरी पात्र व अपात्र ठरतील, याबाबत अद्याप संदिग्धता७७ सहकारी संस्था,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्र

कोल्हापूर ,दि. ०४ : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केल्याची प्रमाणपत्रे वाटली. त्यांच्या खात्यावर जमाखर्च करण्याचे आदेश जिल्हा बॅँकांना दिले; पण त्याचे पैसे अद्याप बॅँकेला मिळाले नाहीत. जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांचा ११ लाख ८४ हजारांचा जमाखर्च कागदोपत्री झाला आहे.

जिल्ह्यातील पीककर्जाचा ९० टक्के पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होत असल्याने कर्जमाफीचा थेट परिणाम बॅँकेवर होतो. शासनाच्या निकषानुसार दीड लाखाच्या आतील ४९ हजार ९३७ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांची १७३ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या २ लाख ९ हजार २०५ शेतकऱ्यांचा ३६२ कोटी ९५ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ४६७ शेतकऱ्यांचा ५८५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव अंतिम झाला आहे. त्यातून आता चाळण लागून किती शेतकरी पात्र व अपात्र ठरतील, याबाबत अद्याप संदिग्धता आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, हे दाखविण्यासाठी राज्य सरकारने घाईगडबडीने १८ आॅक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यातून दोन शेतकऱ्यांना बोलाविले. त्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच पद्धतीने जिल्हा पातळीवरही २५ शेतकऱ्यांचा सत्कार झाला.

या २७ शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रकमेचा जमाखर्च करण्याचे आदेश सरकारने बॅँकांना दिले. कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे वाटप करून १५ दिवस उलटले तरी अद्याप त्या शेतकऱ्यांचे ११ लाख ८४ हजार रुपये जिल्हा बॅँकेला मिळाले नाहीत.

७७ सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्रराज्य सरकारच्या ‘आय टी’ विभागाकडून पाठविलेल्या ‘ग्रीन’ यादीची तालुकास्तरीय समितीने छाननी केली. यामध्ये ७७ सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्र ठरले. सर्वाधिक करवीर तालुक्यातील २९ जणांचा यात समावेश आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक