शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

घराची भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:46 IST

वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

आमाजाई व्हरवडे : जुन्या घराची भिंत कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजे गावात ही घटना घडली. आनंदा ज्ञानू जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत माहिती अशी की, आंनदा जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी आठ दिवसापूर्वी घराच्या लहान भिंती काढण्याचे काम सुरु केले होते. आज मुख्य घर पाडून जागा रिकामी करण्यासाठी गावतीलच आठ दहा लोक येणार होते.त्यामुळे घरातील साहित्य कुठे ठेवायचे हे पाहात असताना अचानक मध्यभागी असणारी वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यात जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. लोकांनी मदत कार्य करुन त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी कोल्हापूरला घेवून जात असाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी त्यांना सोंळाकूर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले व शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी