शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

आसुर्लेत सख्ख्या भावाचा खून कौटुंबिक वाद : भावाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:07 IST

आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी

ठळक मुद्देघटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले.

कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी संशयित भाऊ प्रकाश गणपती पाटील (४८) याला अटक केली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आसुर्लेत खून झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. खुनाचे नेमके कारण लवकर स्पष्ट होत नसल्याने राजकीय वास आहे काय, या भीतीने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तत्काळ आसुर्लेकडे रवाना करण्यात आली. गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दिलीप पाटील हे शेती करीत होते. त्यांच्या पत्नीचे २००८ मध्ये आजाराने निधन झाले आहे. त्यांना मुलगा अजित व विवाहित मुलगी आहे. दिलीप स्वतंत्र राहत होते. ते व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांचा धाकटा भाऊ प्रकाश त्यांच्या समोरच स्वतंत्रपणे राहत होता. तो शेती करतो. त्याचे लग्न झाले नव्हते. वडील दारूच्या आहारी गेल्याने मुलगा अजित चुलता प्रकाशजवळच राहतो. दिलीप हे स्वत:च जेवण करून खात होते. नेहमी दारू पिऊन दोघा भावांमध्ये वादावादी होत होती. नेहमीप्रमाणे दिलीप शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारू पिऊन आले. त्यांची व भाऊ प्रकाशची पुन्हा किरकोळ वादातून हाणामारी झाली. नेहमीचा वाद असल्याने शेजारील लोकांनी लक्ष दिले नाही. प्रकाशने लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून भाऊ दिलीप यांचा खून केला. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात गुन्हे आढावा बैठक सुरू होती. खुनाची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले. संशयित भाऊ प्रकाश याला पोलिसांनंी जाग्यावरच अटक केली. या घटनेने आसुर्लेत खळबळ उडाली. निवडणुकीचे वारे असल्याने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशिरा गावात भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण