शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

आसुर्लेत सख्ख्या भावाचा खून कौटुंबिक वाद : भावाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:07 IST

आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी

ठळक मुद्देघटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले.

कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी संशयित भाऊ प्रकाश गणपती पाटील (४८) याला अटक केली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आसुर्लेत खून झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. खुनाचे नेमके कारण लवकर स्पष्ट होत नसल्याने राजकीय वास आहे काय, या भीतीने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तत्काळ आसुर्लेकडे रवाना करण्यात आली. गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दिलीप पाटील हे शेती करीत होते. त्यांच्या पत्नीचे २००८ मध्ये आजाराने निधन झाले आहे. त्यांना मुलगा अजित व विवाहित मुलगी आहे. दिलीप स्वतंत्र राहत होते. ते व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांचा धाकटा भाऊ प्रकाश त्यांच्या समोरच स्वतंत्रपणे राहत होता. तो शेती करतो. त्याचे लग्न झाले नव्हते. वडील दारूच्या आहारी गेल्याने मुलगा अजित चुलता प्रकाशजवळच राहतो. दिलीप हे स्वत:च जेवण करून खात होते. नेहमी दारू पिऊन दोघा भावांमध्ये वादावादी होत होती. नेहमीप्रमाणे दिलीप शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारू पिऊन आले. त्यांची व भाऊ प्रकाशची पुन्हा किरकोळ वादातून हाणामारी झाली. नेहमीचा वाद असल्याने शेजारील लोकांनी लक्ष दिले नाही. प्रकाशने लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून भाऊ दिलीप यांचा खून केला. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात गुन्हे आढावा बैठक सुरू होती. खुनाची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले. संशयित भाऊ प्रकाश याला पोलिसांनंी जाग्यावरच अटक केली. या घटनेने आसुर्लेत खळबळ उडाली. निवडणुकीचे वारे असल्याने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशिरा गावात भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण