शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आसुर्लेत सख्ख्या भावाचा खून कौटुंबिक वाद : भावाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:07 IST

आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी

ठळक मुद्देघटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले.

कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या थोरल्या भावाचा लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून निर्घृण खून केल्याच्या घटनेने शनिवारी जिल्ह्यात खळबळ उडाली. दिलीप गणपती पाटील (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी संशयित भाऊ प्रकाश गणपती पाटील (४८) याला अटक केली.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आसुर्लेत खून झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली. खुनाचे नेमके कारण लवकर स्पष्ट होत नसल्याने राजकीय वास आहे काय, या भीतीने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तत्काळ आसुर्लेकडे रवाना करण्यात आली. गावात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दिलीप पाटील हे शेती करीत होते. त्यांच्या पत्नीचे २००८ मध्ये आजाराने निधन झाले आहे. त्यांना मुलगा अजित व विवाहित मुलगी आहे. दिलीप स्वतंत्र राहत होते. ते व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांचा धाकटा भाऊ प्रकाश त्यांच्या समोरच स्वतंत्रपणे राहत होता. तो शेती करतो. त्याचे लग्न झाले नव्हते. वडील दारूच्या आहारी गेल्याने मुलगा अजित चुलता प्रकाशजवळच राहतो. दिलीप हे स्वत:च जेवण करून खात होते. नेहमी दारू पिऊन दोघा भावांमध्ये वादावादी होत होती. नेहमीप्रमाणे दिलीप शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दारू पिऊन आले. त्यांची व भाऊ प्रकाशची पुन्हा किरकोळ वादातून हाणामारी झाली. नेहमीचा वाद असल्याने शेजारील लोकांनी लक्ष दिले नाही. प्रकाशने लाकडी दांडके आणि दगड डोक्यात घालून भाऊ दिलीप यांचा खून केला. कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात गुन्हे आढावा बैठक सुरू होती. खुनाची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला दगड आणि लाकडी दांडके ताब्यात घेतले. संशयित भाऊ प्रकाश याला पोलिसांनंी जाग्यावरच अटक केली. या घटनेने आसुर्लेत खळबळ उडाली. निवडणुकीचे वारे असल्याने दक्षता म्हणून कोल्हापुरातून राज्य राखीव दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रात्री उशिरा गावात भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण