शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

धर्मांध शक्ती, हुकूमशाहीचा बीमोड करा-निर्धार परिषदेत सामुदायिक शपथ; मुक्ती दलातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:44 AM

लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे.

कोल्हापूर : लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे. अशा शक्तींचा बीमोड केल्याशिवाय आम्हाला, गुलामी संपूर्ण विकास समान विकास प्रत्यक्षात आणताच येणार नाही.

या शक्तींचा बीमोड करण्याची सामुदायिक शपथ बुधवारी घेण्यात आली. निमित्त होते निर्धार परिषदेचे.श्रमिक मुक्ती दल, निर्मिती विचारमंच आणि समविचारी संघटना यांच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त या निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत होते.

पाटणकर म्हणाले, देशात सर्वत्र सध्या लहान-मोठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांना अडथळे आणून ती मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनता आपल्या हक्कांची आंदोलने थांबविणार नाही. जनतेचा विकास होण्यासाठी केवळ घोषणाबाजी नको; प्रत्यक्षात विकास होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

जातीय, धर्मांध ज्या शक्ती विकासाच्या आड येत आहेत, त्यांना आम्ही आडवे केल्याशिवाय गप्प राहणार नाही.संपत देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अनिल म्हमाने यांनी आभार मानले. याप्रसंगी मोहन अनपट, मोहनराव यादव, वसंत पाटील, दिलीप पाटील, डी. के. बोडके, मारुती पाटील, दिलीप गायकवाड, नजर चौगुले, आनंदा मकर, आदी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाहिरी जलशाला उत्स्फूर्त प्रतिसादशाहीर संभाजी भगत यांनी, येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. बुद्धांनी युद्धविरोधी भूमिका घेतली. काही वेळात देशात धर्म उभा केला जातो. आपण पायाभूत काम केले पाहिजे, अशी भूमिका शाहिरी जलशाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली. तिला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.