शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सोशल मीडियावरील फेक पोस्टने उमेदवारांना ‘फेस’! : निवडणूक आयोगही गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:45 IST

परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

ठळक मुद्दे विनाकारण मनस्ताप तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना; दक्षतेची गरज

कोल्हापूर : ‘सत्य सांगण्यासाठी एक गल्ली फिरेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेले असते’ असे सांगितले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील याच प्रकारच्या खऱ्या-खोट्या पोस्टमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पडलेली पोस्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची कधी आणि मग त्याचा खुलासा करायचा कधी, असा प्रश्न या सर्वांसमोरच उभा ठाकला आहे. मात्र, याबाबत निवडणूक आयोगानेही स्पष्ट सूचना दिल्या असून, खोट्या पोस्टबाबत आणि त्या शेअर केल्याबाबतही तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमुळेही तापले आहे. हे वातावरण तापविण्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठी भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात उमेदवाराविषयी गैरसमज पसरविणाºया पोस्ट टाकणे, जुन्या भाषणांचे व्हिडीओ टाकून अमूक नेते तमूक नेत्याच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी पाठिंबा दिला, अशा पोस्ट टाकून गोेंधळ निर्माण करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून काहीजण करत असतात.

संबंधित उमेदवारांच्या सहकारी संस्था, त्यातील गैरकारभार, उसाची बिले दिली आहेत का बुडवली आहेत या सगळ्यांचा पंचनामा खºया-खोट्या आकडेवारीनुसार केला जात असल्याने यामध्ये विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जो-तो कार्यकर्ता आपला नेता कसा चांगला आहे आणि विरोधातील कसा वाईट आहे, हे सांगण्यासाठी मोडतोड केलेले व्हिडीओ वापरून, आवाज बदलून पोस्ट व्हायरल करतात. त्यामुळे याचा त्रास उमेदवार आणि त्यांच्या घरच्यांनाही सोसावा लागत आहे.

या निवडणुकीची बहुतांश सूत्रे युवकांच्या हातात असताना आणि त्यांच्याच हातामध्ये सोशल मीडियाचे प्रभावी अस्त्र असल्याने याची दखल सर्वांकडून घेतली जात आहे. अनेकदा आठ-दहा जणांचा गट एकत्र येऊन मजा म्हणूनही काही पोस्ट टाकतो; परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

उमेदवाराला काही सांगायचेच नाहीअनेकदा खोट्या पोस्टमुळे उमेदवारच अस्वस्थ होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नकारात्मक पोस्टची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचू द्यायची नाही, अशी दक्षता आता संबंधितांचे निकटवर्तीय घेत आहेत. ‘कुणीही उठावं आणि काहीही टाकावं’ असे हे माध्यम असल्याने काहींनी ही दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूक