शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील फेक पोस्टने उमेदवारांना ‘फेस’! : निवडणूक आयोगही गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:45 IST

परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

ठळक मुद्दे विनाकारण मनस्ताप तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना; दक्षतेची गरज

कोल्हापूर : ‘सत्य सांगण्यासाठी एक गल्ली फिरेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेले असते’ असे सांगितले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील याच प्रकारच्या खऱ्या-खोट्या पोस्टमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पडलेली पोस्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची कधी आणि मग त्याचा खुलासा करायचा कधी, असा प्रश्न या सर्वांसमोरच उभा ठाकला आहे. मात्र, याबाबत निवडणूक आयोगानेही स्पष्ट सूचना दिल्या असून, खोट्या पोस्टबाबत आणि त्या शेअर केल्याबाबतही तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमुळेही तापले आहे. हे वातावरण तापविण्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठी भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात उमेदवाराविषयी गैरसमज पसरविणाºया पोस्ट टाकणे, जुन्या भाषणांचे व्हिडीओ टाकून अमूक नेते तमूक नेत्याच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी पाठिंबा दिला, अशा पोस्ट टाकून गोेंधळ निर्माण करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून काहीजण करत असतात.

संबंधित उमेदवारांच्या सहकारी संस्था, त्यातील गैरकारभार, उसाची बिले दिली आहेत का बुडवली आहेत या सगळ्यांचा पंचनामा खºया-खोट्या आकडेवारीनुसार केला जात असल्याने यामध्ये विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जो-तो कार्यकर्ता आपला नेता कसा चांगला आहे आणि विरोधातील कसा वाईट आहे, हे सांगण्यासाठी मोडतोड केलेले व्हिडीओ वापरून, आवाज बदलून पोस्ट व्हायरल करतात. त्यामुळे याचा त्रास उमेदवार आणि त्यांच्या घरच्यांनाही सोसावा लागत आहे.

या निवडणुकीची बहुतांश सूत्रे युवकांच्या हातात असताना आणि त्यांच्याच हातामध्ये सोशल मीडियाचे प्रभावी अस्त्र असल्याने याची दखल सर्वांकडून घेतली जात आहे. अनेकदा आठ-दहा जणांचा गट एकत्र येऊन मजा म्हणूनही काही पोस्ट टाकतो; परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

उमेदवाराला काही सांगायचेच नाहीअनेकदा खोट्या पोस्टमुळे उमेदवारच अस्वस्थ होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नकारात्मक पोस्टची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचू द्यायची नाही, अशी दक्षता आता संबंधितांचे निकटवर्तीय घेत आहेत. ‘कुणीही उठावं आणि काहीही टाकावं’ असे हे माध्यम असल्याने काहींनी ही दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूक