शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

कारखान्यांनी लिहून घेतलेली संमतीपत्रे अमान्यच : ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल-- सौरव राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:03 IST

शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते.

कोल्हापूर : ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत देण्याबाबत साखर कारखान्यांनी ऊसनोंद करारात घेतलेली संमतीपत्रे अमान्य असून, शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ वेळेत द्यावीच लागेल. जे देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा साखर आयुक्त सौरभ राव यांनी दिला.

संमतीपत्राच्या आडून साखर कारखानदार शेतकऱ्यांची आडवणूक करीत असल्याबाबत सोमवारी (दि. १०) आंदोलन अंकुश, जय शिवराय व बळिराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने साखर आयुक्त राव यांची भेट घेतली. शेतकरी कारखान्यांकडे ज्यावेळी उसाची नोंद देतात, त्यावेळी करारनाम्यात बेकायदेशीर अट टाकली जाते. दोन टप्प्यांत एफआरपी द्या, याबाबत कोठेही तक्रार करणार नाही, व्याजही मागणार नाही, असे लिहून घेतले जाते. याबाबत शेतकरी अनभिज्ञ राहतो. मात्र संमतीपत्राचा आधार घेऊन साखर कारखाने एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे देण्यासाठी शेतकºयांची अडवणूक करीत आहेत.

कारखान्याकडे पैसे उपलब्ध होतील त्यावेळी देऊ, अशी भूमिका घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे संघटनांनी निदर्शनास आणून दिले. यावर अशा प्रकारची अडवणूक पूर्णपणे चुकीची असून कायद्याप्रमाणे चौदा दिवसांत शेतकºयांना पैसे देणे बंधनकारक आहे. विहीत वेळेत एफआरपी न दिल्यास १५ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे लागेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

यावेळी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, ‘बळिराजा’ संघटनेचे बी. जी. पाटील, राकेश जगदाळे, आदी उपस्थित होते.अवास्तव नोकरभरतीला चाप लावणारअवास्तव नोकरभरती केल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्याचा परिणाम शेतक-यांना एफआरपी देण्यावर होतो; त्यामुळे अशा प्रकारच्या भरतीला चाप लावणार असल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर