शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

कारखाने चांगले चालविणाऱ्यांची वर्णी

By admin | Updated: August 29, 2014 00:31 IST

ऊस दर मंडळास लागला मुहूर्त : संघटनेची अजूनही हरकतच

विश्वास पाटील - कोल्हापूर -सहकारी व खासगी क्षेत्रातही उत्तम साखर कारखाने चालविणाऱ्या लोकांचीच राज्य शासनाच्या ऊस दर नियंत्रण मंडळावर वर्णी लागली आहे. राजकीय समतोल सांभाळतानाच हे मंडळ अधिकाधिक सर्वमान्य कसे होईल, असाच प्रयत्न सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ‘देर से सही, लेकीन दुरुस्त आए...’ अशीच काहीशी प्रतिक्रिया साखर कारखानदारींतून व्यक्त  झाली.मंडळावर काँग्रेसच्या कोट्यातून शाहू (कागल)चे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे व सातारा जिल्ह्यातील भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांना संधी मिळाली. ‘शाहू’ अनेक वर्षांपासून राज्यात सर्वाधिक दर देण्यात पुढे आहे. सहकारातील ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ अशी या कारखान्याची देशभर ओळख आहे. माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगांवकर यांची निवड ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून झाली आहे. त्यांचा हिंगोली जिल्ह्यांत पूर्णा सहकारी साखर कारखाना  आहे. खासगी साखर कारखाना म्हणून कळंब-रांजणी (जि. उस्मानाबाद) येथील नॅचरल शुगर्सचे बी. बी. ठोंबरे व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या प्रतिनिधीस स्थान देण्यात आले आहे. त्यातील ‘पूर्ती’ला प्रतिनिधित्व हे भाजपच्या कोट्यातून दिले गेले आहे. ठोंबरे खासगी कारखान्याचे मालक असले तरी त्यांचा या उद्योगाचा चांगला अभ्यास आहे.  त्यांचा कारखानाही चांगला सुरू आहे. आता ‘शेतकऱ्यांचे प्रतिनिधी’ म्हणून कुणाची वर्णी लागणार याबद्दलच उत्सुकता आहे. पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे किंवा सतीश काकडे यापैकी कुणाला तरी तिथे संधी मिळण्याची शक्यता आहे. ऊस दर ठरविण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन आठ महिने उलटले तरी हे मंडळ अजून अस्तित्वातच आलेले नव्हते. महाराष्ट्र ऊस खरेदी आणि पुरवठा-२०१३ विधेयकाच्या मसुद्याला ३ डिसेंबर २०१३ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यासंबंधीच्या विधेयकास मंजुरी देण्यात आली. डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या आधारावर हा कायदा आहे. त्याचे नियम करण्यातील दिरंगाई शिवाय दोन्ही काँग्रेसच्या तिढ्यात मंडळांवर कुणाला घ्यायचे, याचाही निर्णय होत नसल्याने ते लांबले होते. बैठकांना जाणार नाही : रघुनाथदादाया मंडळांमध्ये अध्यक्ष-सचिव व मंडळाचे तीन सदस्य असे पाच सचिव हे सरकारी अधिकारी आहेत. पाच कारखान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे कुठला कारखानदार उसाला दर वाढवून दिला पाहिजे, असे म्हणेल, अशी विचारणा करून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जोपर्यंत दोन कारखान्यांतील अंतराची अट, मोलॅसिस विक्रीवरील निर्बंध आणि रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार उत्पन्नातील ‘७० : ३०’ चा फॉर्म्युला सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत ऊस दर मंडळाच्या बैठकांना जाणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.