शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कारखाने चांगले चालविणाऱ्यांची वर्णी

By admin | Updated: August 29, 2014 00:31 IST

ऊस दर मंडळास लागला मुहूर्त : संघटनेची अजूनही हरकतच

विश्वास पाटील - कोल्हापूर -सहकारी व खासगी क्षेत्रातही उत्तम साखर कारखाने चालविणाऱ्या लोकांचीच राज्य शासनाच्या ऊस दर नियंत्रण मंडळावर वर्णी लागली आहे. राजकीय समतोल सांभाळतानाच हे मंडळ अधिकाधिक सर्वमान्य कसे होईल, असाच प्रयत्न सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ‘देर से सही, लेकीन दुरुस्त आए...’ अशीच काहीशी प्रतिक्रिया साखर कारखानदारींतून व्यक्त  झाली.मंडळावर काँग्रेसच्या कोट्यातून शाहू (कागल)चे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे व सातारा जिल्ह्यातील भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांना संधी मिळाली. ‘शाहू’ अनेक वर्षांपासून राज्यात सर्वाधिक दर देण्यात पुढे आहे. सहकारातील ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ अशी या कारखान्याची देशभर ओळख आहे. माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगांवकर यांची निवड ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून झाली आहे. त्यांचा हिंगोली जिल्ह्यांत पूर्णा सहकारी साखर कारखाना  आहे. खासगी साखर कारखाना म्हणून कळंब-रांजणी (जि. उस्मानाबाद) येथील नॅचरल शुगर्सचे बी. बी. ठोंबरे व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या प्रतिनिधीस स्थान देण्यात आले आहे. त्यातील ‘पूर्ती’ला प्रतिनिधित्व हे भाजपच्या कोट्यातून दिले गेले आहे. ठोंबरे खासगी कारखान्याचे मालक असले तरी त्यांचा या उद्योगाचा चांगला अभ्यास आहे.  त्यांचा कारखानाही चांगला सुरू आहे. आता ‘शेतकऱ्यांचे प्रतिनिधी’ म्हणून कुणाची वर्णी लागणार याबद्दलच उत्सुकता आहे. पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे किंवा सतीश काकडे यापैकी कुणाला तरी तिथे संधी मिळण्याची शक्यता आहे. ऊस दर ठरविण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन आठ महिने उलटले तरी हे मंडळ अजून अस्तित्वातच आलेले नव्हते. महाराष्ट्र ऊस खरेदी आणि पुरवठा-२०१३ विधेयकाच्या मसुद्याला ३ डिसेंबर २०१३ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यासंबंधीच्या विधेयकास मंजुरी देण्यात आली. डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या आधारावर हा कायदा आहे. त्याचे नियम करण्यातील दिरंगाई शिवाय दोन्ही काँग्रेसच्या तिढ्यात मंडळांवर कुणाला घ्यायचे, याचाही निर्णय होत नसल्याने ते लांबले होते. बैठकांना जाणार नाही : रघुनाथदादाया मंडळांमध्ये अध्यक्ष-सचिव व मंडळाचे तीन सदस्य असे पाच सचिव हे सरकारी अधिकारी आहेत. पाच कारखान्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे कुठला कारखानदार उसाला दर वाढवून दिला पाहिजे, असे म्हणेल, अशी विचारणा करून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जोपर्यंत दोन कारखान्यांतील अंतराची अट, मोलॅसिस विक्रीवरील निर्बंध आणि रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार उत्पन्नातील ‘७० : ३०’ चा फॉर्म्युला सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत ऊस दर मंडळाच्या बैठकांना जाणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.