शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

असळजमध्ये चित्र अस्पष्ट तरीही उमेदवारीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 10, 2017 23:23 IST

‘तू.. तू.. मैं.. मैं..’ होण्याची शक्यता : उमेदवारांची निवड करताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार

चंद्रकांत पाटील --- गगनबावडा --मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत असळज मतदारसंघ इतर मागास महिला प्रवर्ग आरक्षित राहिल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली होती. २००७ नंतर पुन्हा २०१७ ला या मतदारसंघाचे आरक्षण खुले झाल्याने उमेदवारीसाठी मोठीच रस्सीखेच असणार आहे. उमदवारीसाठी ‘तू.. तू.. मैं.. मंै..’ होण्याच्या दाट शक्यतेने उमेदवार निवडीसाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गगनबावडा तालुक्याचे राजकारण हे नेहमी गटा-तटाभोवती फिरत असल्याने इथे पक्षीय राजकारणाला फारसे महत्त्व नाही. विधानसभा, लोकसभा व जिल्हा परिषदेसारख्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कोण कार्यकर्ता कोणत्या गटात सक्रीय आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. असे असले तरी के.डी.डी.सी.सी. बॅँकेचे संचालक पी. जी. शिंदे, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावानेच गट-तटाचे राजकारण होत असते. आतापर्यंत हा मतदारसंघ आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाखाली कॉँग्रेसचा बालेकिल्ला ठरला आहे.पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे यावेळच्या निवडणुकांना वेगळे स्थान मिळाले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी खिळखिळी झाली असून, घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. असे असले तरी पी. जी. शिंदे गटाला अपवाद वगळता या मतदारसंघात फारसे यश मिळाले नाही. कॉँग्रेसने मात्र २००२ मध्ये वसुंधरा पाटील, २००७ मध्ये संभाजीराजे पाटणकर व २०१२ मध्ये प्रिया वरेकर यांनी सरळ लढतीत बाजी मारली होती. तर असळज पंचायत समितीमधून संभाजी कुंभार, सरिता पाटील व तानाजीराजे पाटणकर यांनी विजय मिळविला होता. अपवाद कातळी मतदारसंघाचा असून, पी. जी. शिंदे गटाने २००२ मध्ये राष्ट्रवादी पक्षातून कमल काटेंच्या रूपाने व २००७ मध्ये जनस्वराज्य पक्षातून भारती कांबळेच्या रूपाने विजय मिळविला होता. मात्र, २०१२ च्या निवडणुकीत शालिनी शेळके यांनी कॉँग्रेसचा झेंडा फडकावून पी. जी. शिंदे गटाला धक्का दिला होता. सेनेला मात्र पराभूत व्हावे लागले होते.यावेळी पी. जी. शिंदे यांच्या मागे भाजपची जरी कुमक असली, तरी गजानन चौधरी व बंडू आप्पा पडवळ यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते कॉँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे कॉँग्रेस येथे अधिकच मजबूत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावणे आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे अधिकच जड झाले आहे. विजयाच्या निश्चिततेमुळे या मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी जरी मोर्चेबांधणी केली असली तरी मानसिंग पाटील व संभाजी पाटणकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. संधी मिळाल्यास कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग पाटीलही येथून लढण्यास तयार आहेत. भाजपमधून नंदू पवार यांचे नाव पुढे येत असून, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मात्र शांत आहेत. सेनेतून तानाजी पाटील इच्छुक आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत घातलेला भक्कम पाया मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढासळल्यामुळे शिवसेनेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. प्रत्येक निवडणुकीत घेतली जाणारी कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका सेनेला घातक ठरल्यामुळे त्यांनी यावेळी सावध भूमिका घेऊन पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील गट व पी. जी. शिंदे गट यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.असळज गण मागास महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे सर्वच पक्षांना येथे धावाधाव करावी लागते आहे. सक्षम उमेदवारांच्या शोधात नेतेमंडळी असून, आपली भूमिका मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. कातळी गणातून कॉँग्रेसमधून एम. जी. पाटील व संजय पाटील यांच्या नावांची चर्चा असून, भाजपमधून आनंदा पाटील हे नाव पुढे आहे. शिवसेनेने मात्र यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीबाबत गुप्तता पाळल्यामुळे त्यांचे उमेदवार कोण, यांचे तर्कवितर्क लढविले जात आहेत; पण कार्यकर्त्यांच्या नावांची कितीही चर्चा झाली तरी अंतिम नाव मात्र नेतेमंडळीच सुचवतील ते नक्की असते, हे आजवरचे चित्र आहे.प्रत्येक गटाने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. तिरंगी लढत की युती करून एकमेकाला शहकाटशह अशी ही खेळी होऊन समोरच्याला नामोहरम करण्याचा डावही टाकला जाण्याची शक्यता आहे; पण ही युती कोण कोणाबरोबर करणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.असळज जि. प. मतदारसंघातील गावे असळज, पळसंबे, वेसरफ, शेणवडे, खोकुर्ले, अणदूर, सांगशी, सैतवडे, पारगावकरवाडी, गगनबावडा, जांभुळणेवाडी, धुंदवडे, चौधरवाडी, बेरिवडे, शेळशी, जर्गी, कडवे, बावेली, बोरबेट, गारिवडे, कातळी, नरवेली, लखमापूर, तळये खुर्द.