शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

डोळं पुसावं की नाक झाकावं...

By admin | Updated: August 17, 2014 22:32 IST

मलकापूर : दुर्गंधीमुळे नातेवाइकांना भोगाव्या लागतात नरकयातना-स्मशानभूमीच्या मरणयातना...

माणिक डोंगरे - मलकापूर  -नवनवीन प्रकल्प यशस्वीपणे राबवणाऱ्या मलकापूर शहाराच्या स्मशानभूमीला मात्र कचरा डेपोमुळे दुर्गंधीचे ग्रहण लागले आहे़ स्मशानभूमीतच कचऱ्याचा डोंगर तयार झाल्यामुळे अंत्यविधीवेळी नातेवाइकांना तोंड बांधूनच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़मलकापूर शहराची सुमारे ३५ हजार लोकसंख्या आहे़ महामार्ग पूर्व व जुने गावठाण परिसरासाठी एकाच स्मशानभूमीचा वापर केला जातो़ आगाशिवनगर व शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम भागाला कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी चार किलोमीटर जावे लागते़ या दोन्ही विभागाची स्मशानभूमीची व्यथा अनेक वर्षांपासूनची आहे़ शहराचा प्रतिदिन किमान १० ते १२ टन कचरा गोळा होतो़ नगरपंचायतीने परिसरातील सर्व विहिरी मुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावली़ दोन वर्षांपासून स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेतच कचरा टाकला जातो़ प्रतिदिन गोळा होणारा कचरा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कचऱ्याचा डोंगरच तयार झाला आहे़ ओला व सुका कचरा एकत्रच असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे़ ७० टक्के नागरिक अंत्यविधीसाठी कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत जातात. मात्र मलकापूर जुने गावठाण व महामार्गाच्या पूर्वेकडील नागरिकांना अशा जीवघेण्या घाणीतच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़ नगरपंचायतीच्या वतीने जुन्या स्मशानभूमीच्या पूर्वेस नवीन स्मशानभूमीचे काम हाती घेतले आहे़ ते काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि दुर्गंधीच्या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़ माशांचा उपद्रव, आरोग्य धोक्यात परिसरात ओल्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होत आहे़ जुन्या गावठाणासह आसपासच्या कॉलन्यांमध्ये एखादे मोहोळ उठावे, असा माश्यांचा उपद्रव वाढला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ पन्नास कुत्र्यांचा कळप स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाखाली सडके अन्न व मृत प्राणी असल्यामुळे ते खाण्यासाठी परिसरात ५० ते ६० कुत्र्यांचा कळपच वावरत असतो़ या कळपातील काही कुत्री हिंस्त्र बनली आहेत़ परिसरातून जाणाऱ्या लहान मुलांवर त्यांच्याकडून हल्ला केला जातो.