शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तोकडी हद्दवाढ नकोच!

By admin | Updated: March 23, 2015 00:41 IST

नगरसेवकांची भूमिका : निधीसाठी कोल्हापूर ‘अ’ वर्ग नगरपालिकेची मागणी करणार

कोल्हापूर : राज्य शासनाने कोल्हापूर शहराची हद्दवाढ नाकारताना कोणती कारणे दिली आहेत, याचा प्रशासन व नगरसेवक ऊहापोह करणार आहेत. दोन ‘एमआयडीसीं’सह १७ गावे समाविष्ट असणारी हद्दवाढच करा; अन्यथा महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्यासह ऐतिहासिक शहर म्हणून घोषणा किंवा ‘अ’ वर्ग नगरपालिका करण्याची मागणी लवकरच पालिकेतर्फे राज्य शासनाकडे केली जाणार आहे. भौगोलिक संलग्नता असणाऱ्या पाच-सहा गावांसह हद्दवाढीचा प्रस्ताव मान्य नसल्याचे रविवारी सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्यांनी स्पष्ट केले. नागपूर, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, लातूर अशा महापालिकांची हद्दवाढ झाल्यानंतर दहा वर्षांत झपाट्याने विकास झाला. याउलट राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या १९ वर्षांत कोल्हापूर शहराची एक इंचानेही हद्दवाढ झाली नाही. शहराची दृष्टिक्षेपात आलेली हद्दवाढ आता पुन्हा खुंटण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीस ४२ गावांचा असणारा प्रस्ताव १७ गावांवरून चार-पाच गावांवर येऊन ठेपला आहे. भौगोलिक संलग्नतेच्या नावाखाली आजूबाजूची ही गावे शहरात समाविष्ट करून अर्थव्यवस्थेवर भार टाकण्यास प्रशासन व नगरसेवक तयार नाहीत. यासाठी अभ्यास करून शासनास मागणी करण्याची तयारी नगरसेवक व प्रशासन यांनी केली आहे. (प्रतिनिधी)अप्प्रचारपुणे व ठाणे महापालिकेची स्थापनेनंतर पाच-पाचवेळा हद्दवाढ झाली. नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांना पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच नव्याने कर लादला जाणार नाही, याचा भरवसा राजकीय नेतृत्वाने दिल्यानेच एका पायावर ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली. याउलट कोल्हापूर शहराची हद्दवाढ म्हणजे शहरवासीयांचा फायदा आणि ग्रामीण भागाचे नुकसान, असा अप्प्रचार केला गेला. त्यामुळेच सुरुवातीस ४२ गावांचा समावेश असलेला प्रस्ताव आता १७ गावांवरून चार-पाच गावांवर आला आहे.हद्दवाढ ही झालीच पाहिजे. मात्र, भौगोलिक अभ्यास करून हद्दवाढीमध्ये एमआयडीसींचा समावेश झाला पाहिजे. सलगपणे विकास करणे शक्य होईल, अशी गावे निवडणे गरजेचे आहे. शहराची हद्द अगदी कागल ते वडगावपर्यंत झाली पाहिजे. - शारंगधर देशमुख, गटनेता - काँग्रेसदोन-चार गावे समाविष्ट केली म्हणजे त्यास हद्दवाढ म्हणता येणार नाही. शहरासह लगतच्या गावांचा विकास होणे गरजेचे आहे. शासन हद्दवाढीस अनुकूल नसल्यास महापालिकेचे ‘अ’ वर्ग नगरपालिकेत रूपांतर करावे, अशी मागणी करणार आहे. - राजेश लाटकर, गटनेता- राष्ट्रवादीहद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या सर्व संभावित १७ गावांतील ग्रामपंचायत सदस्य व सर्व महत्त्वाच्या सामाजिक संघटनांची लवकरच एक व्यापक बैठक घेणार आहे. महापालिकेची हद्दवाढीमागील भूमिका समजावून सांगून त्यांचा गैरसमज दूर करू. यानंतरच राज्य शासनाकडे सविस्तर हद्दवाढीचा पुनर्प्रस्ताव पाठवू. - पी. शिवशंकर, आयुक्त ५शहराचा परीघ अवघा सहा किलोमीटर असताना महापालिकेची यंत्रणा पोहोचू शकत नाही. कर रूपातून मिळणारे उत्पन्न व हद्दवाढीनंतर मिळणारा निधी यावर डोळा ठेवूनच हद्दवाढ दामटली जात आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी आमचा अस्सल ग्रामीण बाज का मोडायला निघालात ? - बी. ए. पाटील, हद्दवाढविरोधी कृती समिती