शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची जगण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST

वस्तू ...

वस्तू मार्च २०२० मधील दर सध्याचे दर

पेट्रोल ७५.३१ ९८.३२

डिझेल ६४.२७ ८८.४०

गॅॅस सिलिंडर ५९७ ते ६०० ८१३ ते ८२०

सिमेंट (प्रतिपोते) ३०० ते ३२० ३५०ते ३७०

स्टील (प्रतिटन) ४५ ते ५० हजार ६२ ते ६५ हजार

वाळू (प्रतिट्रॉली) ६५०० ते ७००० ७५०० ते ८०००

दुचाकी ( १०० सीसी) ४५ ते ४९ हजार ६० ते ८५ हजार

चारचाकी (बेसिक मॉडेल) २ लाख ७० हजार ३ लाख २० हजार

वैद्यकीय विमा (एक लाखांचा) २५६० ते ११७१८ २८४३ ते १३०२०

रेल्वे प्लॅॅटफॉर्म तिकीट ५ ते १० ५०

सर्वसामान्य काय म्हणतात?

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्याची सर्वांना झळ बसली आहे. अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. व्यवसायाची गती मंदावली आहे. नोकरदारांचे पगार वाढण्याऐवजी कमी झाले आहेत. मात्र, घर खर्च वाढतच आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसवताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

-उमा कोळी, गंगावेश.

गॅॅस सिलिंडर, खाद्यतेल, धान्य असे सर्व साहित्याचे दर वाढले आहेत. गेल्यावर्षी आमच्या कुटुंबाचा दर महिन्याचा खर्च नऊ हजार रुपये होत होता. यावर्षी हा खर्च १३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्यातुलनेत उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे बजेट कोलमडले आहे. बचत करणे शक्य होत नाही.

-नसिता महालकरी, मंगळवारपेठ.

कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी पगारवाढ झालेली नाही; पण दर महिन्याचा किराणासह अन्य घरखर्च थांबलेला नाही. त्यात सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण ठेवल्यास आम्हा सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

-दीपक पाटील, गोकुळ शिरगाव.

अर्थतज्ज्ञ काय म्हणतात?

सध्याची भाववाढ ही नेहमीची नसून ती अधिक घातक आहे. रोज काम करून जगणाऱ्यांसह इतर १५ लाख कुटुंबे कोरोनामुळे बेरोजगार झाली आहेत. त्यांना मोठा फटका बसला आहे. स्थानिक बाजारपेठेतील टंचाई, साठेबाजीमुळे दरवाढ होत असल्याचे दिसत आहे. या दरवाढीने सर्वसामान्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. महागाई रोखण्यासाठी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅॅस सिलिंडर, खाद्यतेल, धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचे दर नियंत्रित करावेत. कृत्रिम टंचाई, साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

-डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ.

कोरोनामुळे एका बाजूला रोजगार मोठ्या प्रमाणात घटले असून दुसऱ्या बाजूला महागाईने डोके वर काढले आहे. भारतात किरकोळ किंमत निर्देशांक सध्या पाच टक्के आहे. त्यामध्ये खाद्यतेल भाववाढ २५ टक्के आणि कडधान्य १३ टक्क्यांनी वाढले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भाववाढीची मर्यादा सर्वसाधारणपणे चार टक्के ठेवली असून त्यापेक्षा दोन टक्के कमी किंवा जास्त ही सर्वसाधारण भाववाढ ठरते. भाववाढीमध्ये सर्वात मोठे योगदान तेल किमतीचे आहे. त्यावर पूर्णतः केंद्र सरकारच्या करांचा मोठा बोजा आहे. तेलाच्या किमतीतील वाढीबरोबर वाहतूक आणि सर्व वस्तूंच्या किमती वाढत आहेत. सध्या भाववाढ होत असून त्यापेक्षा अधिक प्रमाणात रोजगारात घट होत असल्याने जगणे महाग होत आहे. त्यावर सरकारने रोजगार केंद्रित प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

-डॉ. विजय ककडे, अर्थशास्त्राचे अभ्यासक.