शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आरसीईपीतून वस्त्रोद्योगाला वगळा; शेट्टी यांची पंतप्रधान, वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 21:23 IST

शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या वस्त्रोद्योगात गेल्या पाच वर्षांतील धोरणामुळे मंदी पसरली आहे. त्यातच आता या नव्या धोरणामुळे चीन व बांगलादेशमधील सूत व कापड देशाच्या बाजारपेठेत येणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका या देशांतर्गत उद्योगांना बसणार आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधानांकडेही निवेदन पाठवून वस्त्रोद्योग व्यवसायासमोर येणाºया अडचणींचा पाढाच वाचला आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी अर्थात आरसीईपीमुळे वस्त्रोद्योग रसातळाला जाणार आहे. सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या उद्योगाला आरसीईपीतून वगळावे, अशी आग्रही मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान, वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरकारच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रवी कपूर यांनी निवेदन स्वीकारले.

आरसीईपी धोरणामुळे शेती आणि दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याने त्यातून या क्षेत्रांना वगळावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील देशातील शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन केली होती. यानंतर या धोरणामुळे वस्त्रोद्योगालाही मोठा फटका बसणार असल्याने शेट्टी यांनी स्वतंत्रपणे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन मागणी केली. पंतप्रधानांकडेही निवेदन पाठवून वस्त्रोद्योग व्यवसायासमोर येणाºया अडचणींचा पाढाच वाचला आहे.

शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या वस्त्रोद्योगात गेल्या पाच वर्षांतील धोरणामुळे मंदी पसरली आहे. त्यातच आता या नव्या धोरणामुळे चीन व बांगलादेशमधील सूत व कापड देशाच्या बाजारपेठेत येणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका या देशांतर्गत उद्योगांना बसणार आहे. वस्त्रोद्योग पूर्णपणे मोडून पाडणारेच हे धोरण ठरणार आहे. या धोरणामुळे देशातील व राज्यातील करावरही मोठा परिणाम होऊन आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याने नीती आयोगाने देखील याला विरोध केला आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPower ShutdownभारनियमनMarketबाजार