शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:46 IST

महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंतयूजीसीला पाठविणार पत्र : विरोधकांनी राजकारणापेक्षा विद्यार्थिहिताचा विचार करावा

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी द्यावयाची. ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे, त्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर घेतली जाईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे.

अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मंत्री सामंत म्हणाले

  • या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे.
  • एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल.
  • जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल.
  • ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
  • आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.

६० जीआर काढून मागे घेतले नाहीत.६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत. ट्विट करून ते डिलिट केलेले नाही. एक जीआर काढून त्यावर ठाम आहे, असे मंत्री सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या टीकेला उत्तर दिले.खासदार राऊत यांच्या चिरंजीवाबाबतचा व्हिडीओ एडिट केलेला.खासदार विनायक राऊत यांच्या चिरंजीवाबाबत व्हिडिओ ट्विट करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? विरोधकांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. राऊत यांचा चिरंजीव निर्व्यसनी आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले

टॅग्स :Uday Samantउदय सामंतministerमंत्रीkolhapurकोल्हापूर