शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:46 IST

महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंतयूजीसीला पाठविणार पत्र : विरोधकांनी राजकारणापेक्षा विद्यार्थिहिताचा विचार करावा

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी द्यावयाची. ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे, त्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर घेतली जाईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे.

अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मंत्री सामंत म्हणाले

  • या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे.
  • एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल.
  • जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल.
  • ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
  • आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.

६० जीआर काढून मागे घेतले नाहीत.६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत. ट्विट करून ते डिलिट केलेले नाही. एक जीआर काढून त्यावर ठाम आहे, असे मंत्री सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या टीकेला उत्तर दिले.खासदार राऊत यांच्या चिरंजीवाबाबतचा व्हिडीओ एडिट केलेला.खासदार विनायक राऊत यांच्या चिरंजीवाबाबत व्हिडिओ ट्विट करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? विरोधकांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. राऊत यांचा चिरंजीव निर्व्यसनी आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले

टॅग्स :Uday Samantउदय सामंतministerमंत्रीkolhapurकोल्हापूर