शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

ईडब्लूएसचा निर्णय म्हणजे बैल गेला आणि झोपा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय ...

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असला तरी वैद्यकीय विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मात्र बैल गेला आणि झोपा केला असाच अनुभव येत आहे. या कोट्याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, अशी पालकांची खूप दिवसांपासून मागणी होती. परंतु मराठा समाजातील नेत्यांमध्ये एसईबीसी की, ईडब्लूएस असे दोन मतप्रवाह तयार झाल्याने राज्य सरकारनेही निर्णय घेण्यास विलंब केला. त्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. आता राज्य सरकारने या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

मुख्यत: राज्यात एमबीबीएसच्या ५,४२८ जागा असून, त्यातील प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. त्यामध्ये .४,३९६ प्रवेश निश्चित झाले. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय महाविद्यालयातील ४९२ व खासगीमधील ५४० प्रवेश झाले. या फेरीनंतर आता शासकीयमधील ५५ आणि खासगीतील ३५८ प्रवेशासाठी मॉपअप राऊंड सुरु आहे. गेल्या वर्षी ‘नीट’मध्ये ४९१ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास एसईबीसीचे आरक्षण असल्याने शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. याउलट यावर्षी मात्र तब्बल ५९१ गुण असूनही विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांतही प्रवेश मिळणे अवघड बनले. गतवर्षी मराठा समाजातील मुलांना ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ झाला नव्हता; कारण त्यावेळी एसईबीसीमध्ये मराठा समाज होता. अन्य कोणतेही आरक्षण मिळत असेल तर ईडब्लूएसचा लाभ मिळत नाही. ईडब्लूएसमधून ३१५ जागा आहेत. यंदा एसईबीसी आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्याने ईडब्लूएसचा लाभ झाला असता; परंतु खासदार संभाजीराजे यांनी ईडब्लूएसचा लाभ घेतल्यास एसईबीसीचे आरक्षण पदरात पडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारचीही कोंडी झाली. त्यामुळे या प्रवर्गातील लाभार्थी आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली. या प्रवर्गातून किमान निम्म्या जागांवर मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असता तर त्याखालील इतर मुलांना खासगी महाविद्यालयांत तरी प्रवेश मिळू शकला असता; म्हणजे किमान ४२५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह लागले आणि ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर राज्य सरकारने ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे आता ही प्रक्रिया रिव्हर्स करणे अशक्य बनले आहे. कारण त्यांनी प्रवेश अर्जामध्येच जातप्रवर्ग घातल्याने आता त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. तसे करायला राज्य सरकार कितपत तयार होते, त्यातून काही न्यायालयीन वाद होतील का, ही भीती आहे.

ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत आहे. ते लागू करावे, यासाठी मी पहिल्यापासून आग्रह धरत आलो. सरकारला उशिरा शहाणपण सुचले. आता मराठा समाजातील ज्या तरुणांना प्रवेशासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, नोकऱ्यांत संधी मिळणार आहे, ती मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. निवडणुकीनंतर सहा महिने तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र सादर करता येत असेल तर तोच न्याय ईडब्लूएसला का लागू होत नाही, असा माझा युक्तिवाद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे यासंबंधी बोलणे सुरु आहे.

प्रवीणदादा गायकवाड

मराठा क्रांती मोर्चा नेते.