शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केंद्राच्या मदत पॅकेजमधून पर्यटन बेदखल; कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षाला ३०० ते ४०० कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:26 IST

. यात त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश नाही. कोरोनाने सगळ्या जगाला वेठीला धरल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर सर्वाधिक प्रमाणात झाला आहे. चीननंतर अन्य देशांमध्येही याचा शिरकाव झाल्याने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पर्यटन थांबविले.

ठळक मुद्दे योजना जाहीर करण्याची व्यावसायिकांची मागणी भारताच्या पर्यटन क्षेत्रात कोल्हापूरचा वाटा

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमधून पर्यटनासारख्या महत्त्वाच्या व्यवसायाला बेदखल करण्यात आले आहे. ऐन हंगामामध्ये हा व्यवसाय बंद असल्याने जिल्ह्यातील तीनशेहून अधिक कामगारांवर संक्रांत आली आहे. यापुढेही किमान डिसेंबरपर्यंत पर्यटनास परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याने या व्यवसायासाठीही केंद्र शासनाने योजना जाहीर कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

पर्यटनासाठी एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम असल्याने या दरम्यान सर्वाधिक लोक पर्यटन करतात. महाराष्ट्रातून वर्षाला एक कोटी लोक पर्यटनाला जातात. देशात बंगाली, गुजरातीनंतर महाराष्ट्रीय नागरिक सर्वाधिक पर्यटन करतात. भारतात एक कोटी ३० लाख लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. यात त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश नाही. कोरोनाने सगळ्या जगाला वेठीला धरल्याने त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर सर्वाधिक प्रमाणात झाला आहे. चीननंतर अन्य देशांमध्येही याचा शिरकाव झाल्याने सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पर्यटन थांबविले.

विमानसेवा बंद केल्या. भारतात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता, लॉकडाऊनही सुरूच आहे; त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. शासनाने नियमांत अधीन राहून व्यवसायास परवानगी दिली असली तरी त्याचा उपयोग ट्रॅव्हल्स कंपन्या व एजन्सीजना झाला नाही. त्यामुळे मदतीच्या पॅकेजमध्ये पर्यटनाचाही समावेश करावा. रेल्वे, बसेस, मेट्रो सुरू कराव्यात. बँकांकडून कोविड लोन मिळावे, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.

कोल्हापुरातील पर्यटन व्यवसायावर नजर

ट्रॅव्हल एजंटकंपन्या : ९०कामगार : ३००वार्षिक उलाढाल : ३०० ते ४०० कोटीदरवर्षी पर्यटनाला जाणारे नागरिक : एक लाखाच्या वरवर्षाला एका कंपनीकडून पर्यटनाला जाणारे नागरिक : २ हजार

 

कोरोना आटोक्यात आला तर दिवाळीदरम्यान पर्यटन व्यवसाय सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. परदेशी पर्यटन तर आता शक्य वाटत नाही. नव्याने सुरुवात करताना शासनाची नवी नियमावली, विमानांची-बसेसची रचना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.- नंदिनी खुपेरकर, गगन टूर्स

भारताच्या पर्यटन क्षेत्रातील उलाढालीत कोल्हापूरचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी आम्ही ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची स्थापना केली असून, याद्वारे आम्ही आमच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचविणार आहोत.- एन. एन. अत्तार, रसिका ट्रॅव्हल्स

केंद्र शासनाने २० लाख करोड रुपयांच्या आर्थिक पॅकेजमध्ये देशाच्या जीडीपीमध्ये वाढ करणाऱ्या व्यवसायांपैकी दुसºया नंबरच्या पर्यटन उद्योगाचा उल्लेखही झालेला नाही. भारतातील ट्रॅव्हल एजंट, असोसिएशन्स आणि पर्यटन मंत्र्यांना या उद्योगाच्या अडचणी केंद्रापुढे मांडण्यात अपयश आले आहे.- राजू ननवरे, हॉलिडे स्टोअर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय