शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

प्रत्येकवेळी ‘जवाहर’च टार्गेट

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

ऊसदर आंदोलनातून शेतकऱ्यांचीच कोंडी बिकट अवस्था : ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी, ऊस तुटणारा मवाळ; तर अर्ध्यावरती तोड असलेला शेतकरी हिरमुसला

गणपती कोळी - कुरुंदवाडउसाच्या ‘एफआरपी’च्या पहिल्या उचलीवरून ‘स्वाभिमानी’चे साखर कारखानदारांच्या विरोधातील आंदोलन पेटले आहे. ऊसतोड रोखल्याने ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी आहे. ऊस तुटणारा मवाळ भूमिकेत, तर तोड अर्ध्यावरती असलेला शेतकरी वाळणाऱ्या उसाकडे पाहत हिरमुसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘तीन तेरा’ झाली असून, परिस्थिती दयनीय झाली आहे.ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार केला, तर किमान २५०० रुपये दर मिळणे अपरिहार्य आहे. मात्र, साखर कारखान्यांनी पहिली उचल १७०० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांचे सेवा संस्थाचे कर्जही फिटणार नाही. शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी करीत असल्याने एफआरपीवर ठाम असलेल्या शेट्टी यांनी शासन व साखर संघाच्या बैठकीत तडजोड म्हणून ८० व २० टक्के अशा दोन टप्प्यांत घेण्यावर निर्णय घेतल्याने शेतकरीही राजी झाला होता.मुळातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उसाला पाणी मिळत नसल्याने उभे पीक पाण्याअभावी वाळत आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानीने ऊस परिषदेतून व तडजोडीतून ऊसतोड बंद आंदोलनाला बगल दिल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आगतिकतेचा गैरफायदा साखर कारखानदारांनी घेत पहिली उचल २००० रुपयांच्यावर देणे लागत असताना १७०० रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.ऊसतोड थांबविणे हे शेतकऱ्यांनाही मान्य नसले, तरी १७०० रुपये दर घेणेही न परवडणारे आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. स्वाभिमानीला मात्र ऊसतोड रोखून शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांच्या विरोधातील भावना शासनाला कळविण्यासाठी गत्यंतर नसल्याने कारखानदारांना जेरीस आणण्यासाठी ऊसतोड व वाहतूक रोखली गेली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अवस्था मात्र तिहेरी झाली आहे. यापूर्वीच ऊस तुटून गेलेला शेतकरी १७०० रुपयांवर सोसायटीचे देणेही भागणार नसल्याने आक्रमक होऊन आंदोलनात सर्वांत पुढे आहे. ऊस तुटून जाणार असलेल्या शेतकऱ्यांचेही हेच दुखणे असले, तरी पाण्याअभावी उभे पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत असून, तोड रोखण्याबाबत मवाळ भूमिकेत आहे. तर सध्या तोड चालू असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ऊस आंदोलनातून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.तानाजी घोरपडे -- हुपरीऊस विकास योजनेतून आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला साखर कारखाना अशी ओळख निर्माण करणारा हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना हा प्रत्येक आंदोलनावेळी टार्गेट का करण्यात येतो? परिसरातील सात ते आठ कारखान्यांचे गाळप सुरू राहते. मात्र, ‘जवाहर’चेच गाळप का बंद पाडण्यात येते? यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यातून विचारण्यात येत आहे.जवाहरने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, कामगारांची देणी थकविलेली नाहीत. दराच्या बाबतही सर्वांबरोबर, शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना राबविण्यात येतात. आधुनिक आणि यशस्वी शेतीसाठी वेळोवेळी ऊस पिक परिसंवादाद्वारे शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, ५० टक्के अनुदानावर हिरवळीची खते आणि तणनाशकांचा पुरवठा केला जातो. शुद्ध, सुधारित व पायाभूत ऊस बियाणे सभासदांच्या बांधापर्यंत पोहोच करण्यात येतात. ठिबकचा अवलंब करणाऱ्या सभासदांना एकरी दहा हजार अनुदान दिले जाते. द्रवरूप खते, औषधे, गांडूळ बेडची उपलब्धता करून दिली आहे. पाचट वापरासाठी अनुदान दिले जाते. ऊस उत्पादक सभासदांकरिता हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जिओप्लास्टी, कॅन्सर, किडनी ट्रान्स्फरनेशन उपचारांसाठी भरीव वैद्यकीय मदतीचा हात दिला जातो. प्रदूषण नियंत्रणाची आधुनिक योजना राबविल्यामुळे कारखाना परिसरातील गावांना अजिबात उपद्रव होत नाही. कामगारांसाठीही अनेक हितकारक योजना राबविण्यात येत आहेत. दैंनदिन नऊ हजार मेट्रिक टनाची ऊस गळप क्षमता असताना अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करीत दैनंदिन ११ हजारांवर गाळप करण्यात येत आहे. कारखान्याने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांसाठी अमलात आणलेल्या सोयी-सुविधा, उपाययोजना यांची दखल घेऊन शासनाने देश, राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके देऊन ‘जवाहर’ला गौरविले आहे. चालू गळीत हंगामास सुरुवात होऊन अवघे ३६ दिवस झाले आहेत. या कालावधीमध्ये तीन लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ११.८० टक्के सरासरी उतारा मिळाल्याने तीन लाख ९५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन मिळालेले आहे. ‘जवाहर’ची कारकीर्द अशा पद्धतीची असतानाही प्रत्येक आंदोलनावेळी याच कारखान्याला सर्व प्रथम ‘टार्गेट’ करण्यात येते. ऊसतोड, ऊस वाहतूक थांबविणे, गाळप बंद पाडणे, सर्वांत जास्त दराची अपेक्षा व्यक्त करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. ‘जवाहर’ प्रशासनाने आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांचे देणे ठेवून घेतलेले नाही. दर सर्वांबरोबर तर काहीवेळा अधिक असतो. तरीही ‘जवाहरलाच’ टार्गेट का करण्यात येते?