शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

प्रत्येकवेळी ‘जवाहर’च टार्गेट

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

ऊसदर आंदोलनातून शेतकऱ्यांचीच कोंडी बिकट अवस्था : ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी, ऊस तुटणारा मवाळ; तर अर्ध्यावरती तोड असलेला शेतकरी हिरमुसला

गणपती कोळी - कुरुंदवाडउसाच्या ‘एफआरपी’च्या पहिल्या उचलीवरून ‘स्वाभिमानी’चे साखर कारखानदारांच्या विरोधातील आंदोलन पेटले आहे. ऊसतोड रोखल्याने ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी आहे. ऊस तुटणारा मवाळ भूमिकेत, तर तोड अर्ध्यावरती असलेला शेतकरी वाळणाऱ्या उसाकडे पाहत हिरमुसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘तीन तेरा’ झाली असून, परिस्थिती दयनीय झाली आहे.ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार केला, तर किमान २५०० रुपये दर मिळणे अपरिहार्य आहे. मात्र, साखर कारखान्यांनी पहिली उचल १७०० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांचे सेवा संस्थाचे कर्जही फिटणार नाही. शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी करीत असल्याने एफआरपीवर ठाम असलेल्या शेट्टी यांनी शासन व साखर संघाच्या बैठकीत तडजोड म्हणून ८० व २० टक्के अशा दोन टप्प्यांत घेण्यावर निर्णय घेतल्याने शेतकरीही राजी झाला होता.मुळातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उसाला पाणी मिळत नसल्याने उभे पीक पाण्याअभावी वाळत आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानीने ऊस परिषदेतून व तडजोडीतून ऊसतोड बंद आंदोलनाला बगल दिल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आगतिकतेचा गैरफायदा साखर कारखानदारांनी घेत पहिली उचल २००० रुपयांच्यावर देणे लागत असताना १७०० रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.ऊसतोड थांबविणे हे शेतकऱ्यांनाही मान्य नसले, तरी १७०० रुपये दर घेणेही न परवडणारे आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. स्वाभिमानीला मात्र ऊसतोड रोखून शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांच्या विरोधातील भावना शासनाला कळविण्यासाठी गत्यंतर नसल्याने कारखानदारांना जेरीस आणण्यासाठी ऊसतोड व वाहतूक रोखली गेली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अवस्था मात्र तिहेरी झाली आहे. यापूर्वीच ऊस तुटून गेलेला शेतकरी १७०० रुपयांवर सोसायटीचे देणेही भागणार नसल्याने आक्रमक होऊन आंदोलनात सर्वांत पुढे आहे. ऊस तुटून जाणार असलेल्या शेतकऱ्यांचेही हेच दुखणे असले, तरी पाण्याअभावी उभे पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत असून, तोड रोखण्याबाबत मवाळ भूमिकेत आहे. तर सध्या तोड चालू असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ऊस आंदोलनातून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.तानाजी घोरपडे -- हुपरीऊस विकास योजनेतून आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला साखर कारखाना अशी ओळख निर्माण करणारा हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना हा प्रत्येक आंदोलनावेळी टार्गेट का करण्यात येतो? परिसरातील सात ते आठ कारखान्यांचे गाळप सुरू राहते. मात्र, ‘जवाहर’चेच गाळप का बंद पाडण्यात येते? यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यातून विचारण्यात येत आहे.जवाहरने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, कामगारांची देणी थकविलेली नाहीत. दराच्या बाबतही सर्वांबरोबर, शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना राबविण्यात येतात. आधुनिक आणि यशस्वी शेतीसाठी वेळोवेळी ऊस पिक परिसंवादाद्वारे शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, ५० टक्के अनुदानावर हिरवळीची खते आणि तणनाशकांचा पुरवठा केला जातो. शुद्ध, सुधारित व पायाभूत ऊस बियाणे सभासदांच्या बांधापर्यंत पोहोच करण्यात येतात. ठिबकचा अवलंब करणाऱ्या सभासदांना एकरी दहा हजार अनुदान दिले जाते. द्रवरूप खते, औषधे, गांडूळ बेडची उपलब्धता करून दिली आहे. पाचट वापरासाठी अनुदान दिले जाते. ऊस उत्पादक सभासदांकरिता हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जिओप्लास्टी, कॅन्सर, किडनी ट्रान्स्फरनेशन उपचारांसाठी भरीव वैद्यकीय मदतीचा हात दिला जातो. प्रदूषण नियंत्रणाची आधुनिक योजना राबविल्यामुळे कारखाना परिसरातील गावांना अजिबात उपद्रव होत नाही. कामगारांसाठीही अनेक हितकारक योजना राबविण्यात येत आहेत. दैंनदिन नऊ हजार मेट्रिक टनाची ऊस गळप क्षमता असताना अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करीत दैनंदिन ११ हजारांवर गाळप करण्यात येत आहे. कारखान्याने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांसाठी अमलात आणलेल्या सोयी-सुविधा, उपाययोजना यांची दखल घेऊन शासनाने देश, राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके देऊन ‘जवाहर’ला गौरविले आहे. चालू गळीत हंगामास सुरुवात होऊन अवघे ३६ दिवस झाले आहेत. या कालावधीमध्ये तीन लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ११.८० टक्के सरासरी उतारा मिळाल्याने तीन लाख ९५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन मिळालेले आहे. ‘जवाहर’ची कारकीर्द अशा पद्धतीची असतानाही प्रत्येक आंदोलनावेळी याच कारखान्याला सर्व प्रथम ‘टार्गेट’ करण्यात येते. ऊसतोड, ऊस वाहतूक थांबविणे, गाळप बंद पाडणे, सर्वांत जास्त दराची अपेक्षा व्यक्त करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. ‘जवाहर’ प्रशासनाने आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांचे देणे ठेवून घेतलेले नाही. दर सर्वांबरोबर तर काहीवेळा अधिक असतो. तरीही ‘जवाहरलाच’ टार्गेट का करण्यात येते?