शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

प्रत्येकवेळी ‘जवाहर’च टार्गेट

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

ऊसदर आंदोलनातून शेतकऱ्यांचीच कोंडी बिकट अवस्था : ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी, ऊस तुटणारा मवाळ; तर अर्ध्यावरती तोड असलेला शेतकरी हिरमुसला

गणपती कोळी - कुरुंदवाडउसाच्या ‘एफआरपी’च्या पहिल्या उचलीवरून ‘स्वाभिमानी’चे साखर कारखानदारांच्या विरोधातील आंदोलन पेटले आहे. ऊसतोड रोखल्याने ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी आहे. ऊस तुटणारा मवाळ भूमिकेत, तर तोड अर्ध्यावरती असलेला शेतकरी वाळणाऱ्या उसाकडे पाहत हिरमुसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘तीन तेरा’ झाली असून, परिस्थिती दयनीय झाली आहे.ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार केला, तर किमान २५०० रुपये दर मिळणे अपरिहार्य आहे. मात्र, साखर कारखान्यांनी पहिली उचल १७०० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांचे सेवा संस्थाचे कर्जही फिटणार नाही. शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी करीत असल्याने एफआरपीवर ठाम असलेल्या शेट्टी यांनी शासन व साखर संघाच्या बैठकीत तडजोड म्हणून ८० व २० टक्के अशा दोन टप्प्यांत घेण्यावर निर्णय घेतल्याने शेतकरीही राजी झाला होता.मुळातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उसाला पाणी मिळत नसल्याने उभे पीक पाण्याअभावी वाळत आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानीने ऊस परिषदेतून व तडजोडीतून ऊसतोड बंद आंदोलनाला बगल दिल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आगतिकतेचा गैरफायदा साखर कारखानदारांनी घेत पहिली उचल २००० रुपयांच्यावर देणे लागत असताना १७०० रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.ऊसतोड थांबविणे हे शेतकऱ्यांनाही मान्य नसले, तरी १७०० रुपये दर घेणेही न परवडणारे आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. स्वाभिमानीला मात्र ऊसतोड रोखून शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांच्या विरोधातील भावना शासनाला कळविण्यासाठी गत्यंतर नसल्याने कारखानदारांना जेरीस आणण्यासाठी ऊसतोड व वाहतूक रोखली गेली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अवस्था मात्र तिहेरी झाली आहे. यापूर्वीच ऊस तुटून गेलेला शेतकरी १७०० रुपयांवर सोसायटीचे देणेही भागणार नसल्याने आक्रमक होऊन आंदोलनात सर्वांत पुढे आहे. ऊस तुटून जाणार असलेल्या शेतकऱ्यांचेही हेच दुखणे असले, तरी पाण्याअभावी उभे पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत असून, तोड रोखण्याबाबत मवाळ भूमिकेत आहे. तर सध्या तोड चालू असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ऊस आंदोलनातून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.तानाजी घोरपडे -- हुपरीऊस विकास योजनेतून आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला साखर कारखाना अशी ओळख निर्माण करणारा हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना हा प्रत्येक आंदोलनावेळी टार्गेट का करण्यात येतो? परिसरातील सात ते आठ कारखान्यांचे गाळप सुरू राहते. मात्र, ‘जवाहर’चेच गाळप का बंद पाडण्यात येते? यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यातून विचारण्यात येत आहे.जवाहरने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, कामगारांची देणी थकविलेली नाहीत. दराच्या बाबतही सर्वांबरोबर, शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना राबविण्यात येतात. आधुनिक आणि यशस्वी शेतीसाठी वेळोवेळी ऊस पिक परिसंवादाद्वारे शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, ५० टक्के अनुदानावर हिरवळीची खते आणि तणनाशकांचा पुरवठा केला जातो. शुद्ध, सुधारित व पायाभूत ऊस बियाणे सभासदांच्या बांधापर्यंत पोहोच करण्यात येतात. ठिबकचा अवलंब करणाऱ्या सभासदांना एकरी दहा हजार अनुदान दिले जाते. द्रवरूप खते, औषधे, गांडूळ बेडची उपलब्धता करून दिली आहे. पाचट वापरासाठी अनुदान दिले जाते. ऊस उत्पादक सभासदांकरिता हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जिओप्लास्टी, कॅन्सर, किडनी ट्रान्स्फरनेशन उपचारांसाठी भरीव वैद्यकीय मदतीचा हात दिला जातो. प्रदूषण नियंत्रणाची आधुनिक योजना राबविल्यामुळे कारखाना परिसरातील गावांना अजिबात उपद्रव होत नाही. कामगारांसाठीही अनेक हितकारक योजना राबविण्यात येत आहेत. दैंनदिन नऊ हजार मेट्रिक टनाची ऊस गळप क्षमता असताना अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करीत दैनंदिन ११ हजारांवर गाळप करण्यात येत आहे. कारखान्याने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांसाठी अमलात आणलेल्या सोयी-सुविधा, उपाययोजना यांची दखल घेऊन शासनाने देश, राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके देऊन ‘जवाहर’ला गौरविले आहे. चालू गळीत हंगामास सुरुवात होऊन अवघे ३६ दिवस झाले आहेत. या कालावधीमध्ये तीन लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ११.८० टक्के सरासरी उतारा मिळाल्याने तीन लाख ९५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन मिळालेले आहे. ‘जवाहर’ची कारकीर्द अशा पद्धतीची असतानाही प्रत्येक आंदोलनावेळी याच कारखान्याला सर्व प्रथम ‘टार्गेट’ करण्यात येते. ऊसतोड, ऊस वाहतूक थांबविणे, गाळप बंद पाडणे, सर्वांत जास्त दराची अपेक्षा व्यक्त करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. ‘जवाहर’ प्रशासनाने आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांचे देणे ठेवून घेतलेले नाही. दर सर्वांबरोबर तर काहीवेळा अधिक असतो. तरीही ‘जवाहरलाच’ टार्गेट का करण्यात येते?