शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
3
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
4
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
5
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
6
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
7
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
8
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
9
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
10
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
11
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
12
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
13
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
14
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
15
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
16
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
17
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
18
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
19
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
20
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?

वर्ष झाले तरी ‘गाव रस्ता समिती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:53 IST

हा निर्णय होऊन वर्ष उलटले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे अंमलबजावणीचा पत्ता नाही : शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळा श्वास घेणार कधी?

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : ग्रामीण भागातील शेत रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते, गाव रस्ते व वहिवाटीखालील रस्ते मोकळे करून जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होण्यासाठी गाव पातळीवर ‘गाव रस्ता समिती’ गठीत करण्याचा शासन निर्णय अद्याप कागदावरच आहे. हा निर्णय होऊन वर्ष उलटले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शिव रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाव रस्ते व पूर्वांपार चालत आलेले वहिवाटीखालील रस्ते मोकळे करून जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होण्यासाठी गाव पातळीवर ‘गाव रस्ता समिती’ गठीत करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखालील अकराजणांची ही समिती असेल. रस्त्यासंदर्भात उद्भवणारे वाद गावात मिटवून सर्वांच्या सहकार्याने विकास घडविता येईल, अशा दृष्टिकोनातून या समितीची रचना केलेली आहे. तालुकास्तरावरून तहसीलदारांनी याची अंमलबजावणी करायची आहे; परंतु वर्ष उलटले तरी अद्याप या समित्या गठीत झालेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यांमुळे होणाºया वादाचे प्रमाण कमी झालेले नसून, याचा परिणाम विकासावर होत आहे.समितीची रचना अशी :समितीचे अध्यक्ष - सरपंच, समितीचे सदस्य - मंडल अधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सेवा संस्था अध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी, महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, बीट जमादार, पोलीसपाटील, समितीचे सदस्य सचिव-तलाठी.समितीचे कामरस्त्याबाबत गावांमध्ये होणारे वाद समुपदेशन करून मिटवावेत.ज्या ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, तेथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन समजावून सांगणे.रस्त्याबाबत वाद न मिटल्यास याबाबतचे प्रकरण तहसीलदारांकडे दाखल करण्यास सुचविणे.रस्त्यास आवश्यकता असल्यास पर्यायी रस्ता सुचविणे.आवश्यकतेनुसार समितीची बैठक घेऊन रेकॉर्ड ठेवणे.गाव रस्ते मोकळे करण्याची गरज का?केवळ रस्ते नसल्यामुळे पेरणी, मशागत, पीक कापणी वेळेवर करतायेत नाही.नाशवंत कृषी उत्पादने,फळे, भाजीपाला यांना वेळेवर बाजारपेठेतनेता येत नाही.शेतीपूरक व्यवसाय, कृषी गोदामे करता येत नाहीत.सर्पदंश होणे, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीवर तत्काळ मार्ग काढणे अवघड होते. परिणामी, जीवित व वित्त हानीचा धोका वाढतो.रस्ता नसल्याने नाईलाजास्तव काही वेळा शेती विकण्याचे प्रसंग.रस्त्याच्या वादामुळे अनेकवेळा कोर्ट कचेºया, भांडण-तंटे निर्माण होतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा