शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 11:27 IST

मतदार याद्या अद्ययावत करणे, ईव्हीएम मशीनचे गोडावून, स्ट्राँग रुम, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रांचे नियोजन करण्याची सूचना

कोल्हापूर : येणारा काळ निवडणुकांचा आहे. लोकसभा एप्रिल-मेमध्ये व विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे किंवा दोन्ही निवडणुका एकदम झाल्या तरी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली असेल. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणे, ईव्हीएम मशीनचे गोडावून, स्ट्राँग रुम, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रांचे नियोजन करण्याची सूचना दिल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक तसेच सर्व विभागांच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.श्रीकांत देशपांडे म्हणाले, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या किंवा एकत्रित झाल्या तरी विभागाला त्याची तयारी आताच सुरू करावी लागणार आहे. निवडणूका सुरळीत पार पाडणे ही फार मोठी प्रक्रिया असते. त्यात सर्वात महत्वाचा भाग हा शुद्ध मतदार याद्यांचा असतो. त्यामुळे मतदार याद्या तपासा, मयत, स्थलांतरीत व्यक्तींची नावे वगळा, नवमतदारांना सहभागी करून घ्या अशा सूचना दिल्या आहेत.मतदान केंद्रांना भेट देऊन तेथे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा आहे का याची खात्री करा, असतील तर त्यांची दुरुस्ती, नसतील तर सुविधा निर्माण करा. मतदान केंद्र बदलता येईल का याचा विचार करण्यास सांगितले आहे. मतदारांना येथील अनुभव सुखकारक ठरावा असा आमचा प्रयत्न आहे.

मृत-स्थलांतरितांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत

देशपांडे म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात मृत व स्थलांतरितांचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांवर आहे. त्यामुळे येथे मतदार याद्यांचे मोठ्या प्रमाणात शुद्धिकरण करण्याची गरज आहे. कोल्हापुरात मात्र ८० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. ज्यांची छायाचित्रे चांगली नाहीत त्यातील १० टक्के लोक मृत व स्थलांतरित आहेत. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात १० ते १५ टक्के मतदारांची नावे वगळली जातील.

आधार लिंकिंगचे प्रमाण ४५ टक्केमतदान कार्डाला आधार लिंकिंगची राज्यव्यापी मोहिम ४५ टक्के पूर्ण झाली असून कोल्हापुरात हे प्रमाण ६५ टक्के आहे. शंभर टक्के लिंकिंगसाठी आणखी एक वर्षाची मुदत आहे. निवडणूक आयोग व आधारकार्ड व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य करार होऊन लिंकिंग झाले तर मतदाराचा मोबाईल नंबरदेखील डेटाबेसमध्ये येतील. त्यामुळे निवडणुकीचे वेळापत्रक, मतदार यादी, मतदान केंद्राची माहिती एका मेसेजद्वारे देता येणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा