शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

कोरोना काळातही ७५ हजार जणांचा हवाई प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST

मोहन सातपुते उचगाव : गत वर्षापासून कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातल्याने उद्योग, व्यापारासह सर्वच आस्थापने आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडली आहेत. ...

मोहन सातपुते

उचगाव : गत वर्षापासून कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातल्याने उद्योग, व्यापारासह सर्वच आस्थापने आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडली आहेत. वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे; मात्र अशा काळातही कोल्हापूर विमानतळावरून २५ मे २०२० पासून आजपर्यंत तब्बल ७५ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळातही कोल्हापूर विमानतळ भारी ठरले असल्याचे चित्र आहे. कोल्हापूरमध्ये अलायन्स एअर लाईन्सच्या माध्यमातून ९ डिसेंबर २०१८ पासून विमानसेवा सुरू झाली. या विमानतळावरून ९ डिसेंबर २०१८ पासून ६ एप्रिल २०२१ पर्यंत ५८०० फ्लाईटमधून सुमारे २ लाख २५ हजार ७०० प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे मार्च २०२० ला लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांचा ओघ कमी झाला नाही. २५ मे २०२० पासून आजअखेर २०१० फ्लाईटमधून ७५ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला आहे.

कोल्हापूर विमानतळावरून तिरुपती, बंगळुरु, हैदराबाद तसेच मुंबईनंतर अहमदाबादही हवाई मार्गाने कोल्हापूरशी जोडले गेले आहे. त्यामुळे बहुतांश प्रवासी प्रवासासाठी कोल्हापूर विमानतळाला पसंती देत आहेत. कोल्हापूर विमानतळावर सध्या अलायन्स,टू -जेट, इंडिगो या त्रिमूर्ती विमान सेवा कंपन्यांच्या भागीदारीने विमान सेवा सुरू आहे. फेब्रुवारी २० पासून कोल्हापूर ते अहमदाबाद नव्या विमान सेवेची सुरुवात झाली. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस सकाळच्या सत्रात ही विमानसेवा सुरू आहे. अलायन्स एअर लाईनची कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळुरु अशी सेवा सुरू आहे.इंडिगो एअर लाईनची हैदराबाद-कोल्हापूर, तिरुपती-कोल्हापूर,अहमदाबाद-कोल्हापूर अशी विमान सेवा आहे. टू-जेट एअर लाईनकडून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू आहे. यामुळे दिवसभरात १०-१२ फ्लाईट्स कोल्हापूरसाठी सुरू आहेत.

कोट : कोल्हापूर विमानतळावर अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अलायन्स एअर लाईन ,टू-जेट,इंडिगो एअर लाईन्स कंपनीच्या पुढाकाराने उड्डाणे सुरू आहेत.

कमलकुमार कटारिया,

प्रकल्प संचालक

कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण.

चौकट : धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षक भिंत, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा आदी कामे प्रगतिपथावर आहेत. विमानतळ विस्तार व त्रिमूर्ती एअर लाईन्स कंपन्यांच्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या विकासात्मक पर्यटन, व्यापार-उद्योग वाढीला चालना मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकासकामे होत राहिल्याने विमान प्रवाशांचा चढता आलेख वाढत राहिला आहे.

फोटो : १४ विमानतळ

विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची ये-जा सुरू झाली.