शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:38 IST

सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप : कोयनेत १०० टीएमसीवर साठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असलीतरी प्रमुख धरणांतून अजूनही विसर्ग सुरूच आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयनेत १००.६० टीएमसी साठा होता. तर धरणाचे दरवाजे चार फुटाने उचलून त्यातून ३२ हजार ५५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत १५ दिवस धुवाँधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वच प्रमुख धरणे भरली आहेत. सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिमेकडे पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी कमी होत चालली आहे. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणात १००.६० टीएमसी इतका साठा असून, दरवाजे चार फुटांनी वर उचलण्यात आलेत. त्यातून ३२ हजार ५५७ व पायथा वीजगृहातून २१०० असा ३४ हजार ६५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धोम धरणात १२.५५ टीएमसी साठा झाला असून, कण्हेरमध्ये ९.३१, बलकवडी ३.७३, उरमोडी ९.५७, तारळी ४.९८, नीरा-देवघर ११.७६, भाटघर २३.६८ आणि वीरमध्ये ९.५६ टीएमसी इतका साठा आहे.

बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ९, धोम ४, बलकवडी १६, नीरा-देवघर ८ आणि भाटघरला ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर धरण परिसरात पावसाची उघडीप होती.धरणातील विसर्ग क्युसेकमध्ये असा...कोयना - ३४६५७, धोम -६२८, कण्हेर - ४००, बलकवडी - ९६२, उरमोडी - ४५०, तारळी - १७२३, भाटघर - २५४० आणि वीर २१५०. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणwater transportजलवाहतूक