शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिरोळला अखेर तंटामुक्तीची गुढी

By admin | Updated: March 23, 2015 00:42 IST

तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर : विशेष शांतता पुरस्कारही मिळणार

संदीप बावचे -शिरोळ तब्बल पावणे दोन वर्षानंतर अखेर शिरोळ तंटामुक्तीचा गजर झाला असून गावाला राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये विशेष करून शिरोळला ‘विशेष शांतता पुरस्कार’ही जाहीर झाल्यामुळे शांततेतून समृद्धीकडे वाटचाल ही संकल्पना निश्चितच अंमलात आली आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी व शिरोळ वगळता सर्वच गावे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात उत्तीर्ण होऊन लखपती बनली होती. शेती, औद्योगिक, सहकार, दुग्ध व्यवसाय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या तालुक्यात तंटामुक्तीचा गजर होऊन तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी सात वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाची घोषणा केली. त्यासाठी गावागावांत तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील अनेक गावे तंटामुक्त झाली. मात्र, तालुक्याचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ हे तंटामुक्त अभियानापासून अलिप्त होते. या गावात राजकीय तंटा टोकाचा असल्यामुळे आतापर्यंत या गावाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. मात्र, आॅगस्ट २०१३ मध्ये तंटामुक्तीसाठी शिरोळने पुढाकार घेऊन जणू विडाच उचलला होता.गाव तंटामुक्त करून कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्तीचे बक्षीस पटकावयाचे हीच जिद्द गाव पुढाऱ्यांनी बाळगली होती. शिरोळ पोलिसांनीही त्याला प्रोत्साहन दिले. तंटामुक्त अभियानासाठी सर्वांनीच पुढाकार घेतल्यामुळे शांततेतून समृद्धीकडे वाटचाल अखेर यशस्वी झाली आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार शिरोळला जाहीर झाला आहे. शिवाय गावाची विशेष शांतता पुरस्कारा साठीही निवड झाली असून १२ लाख ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे.शांततेकडून समृद्धीकडे वाटचालएकीचे बळमहात्मा गांधी तंटामुक्त अभियानात ग्रामस्थांनी दिलेला सहभाग निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. टोकाचे राजकारण असणाऱ्या तालुक्याच्या गावात तंटामुक्त हे एक आव्हानच होते. मात्र, सर्वांच्याच पुढाकाराने तंटामुक्तीचा गजर अखेर यशस्वी झाला.- पांडुरंग माने, तंटामुक्त अध्यक्षशासनाचे पाठबळतंटामुक्त अभियानात यशस्वी होण्याचा निर्धार केला होता. शिरोळ पोलीस, महसूल यासह अन्य शासकीय विभागाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. यामुळे आम्ही तंटामुक्तीचा घेतलेला विडा पूर्ण केला आहे. यामध्ये सरपंच, सर्व सदस्यांचे पाठबळ मिळाले.- पृथ्वीराज यादव, उपसरपंचसमन्वयामुळे यशगावातील सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळींच्या समन्वयामुळेच तंटामुक्त अभियानात शिरोळला विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत गावाने तंटामुक्त अभियानात यशस्वी वाटचाल केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या मार्गदर्शनातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले असून शिरोळला मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद आहे.- विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक, शिरोळ