शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ते सात-बारा अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : बुरंबाळी ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : बुरंबाळी व नऊ नंबर ( ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्थांचा गेल्या सत्तेचाळीस वर्षांचा त्यांच्या राहत्या घराचा सात-बाराचा प्रश्न आज निकाली निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन या धरणग्रस्तांना एक दिवसात त्यांच्या जमिनीचे सात-बारा करण्याचे आदेश दिले.

यावरती ‘लोकमत’ने ‘बुरंबाळी धरणग्रस्त सात-बाराच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित केले हाेते. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, आजच्या आज सात-बारा तयार करा, असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये थांबून हे सात-बाराचे काम पूर्ण केले.

तुळशी धरण बांधणीपासून हे शेतकरी विस्थापित ठिकाणावर वास्तव्यास आहेत. त्यांचा हा हक्काचा सात-बाराचा लढा गेली कित्येक वर्षे चौकशीच्या प्रक्रियेत अडकला होता. या फाईलवर गेल्या कित्येक दिवसांपासून त्रुटी निघत होत्या. दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चानक बुरंबाळी गावाला भेट दिली व या धरणग्रस्तांच्या मागण्या जाणून घेतल्या.

तेथूनच सात-बारा अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन एकाच दिवसात सात-बारा तयार करण्याची सूचना केली. पण दहा दिवस लोटले तरी सात-बारा तयार न झाल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त सूचना देत सायंकाळपर्यंत सात-बारा अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबूनच हे सात-बारा पूर्ण केले.

रात्री उशिरा ही बातमी बोंबाळे ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपला इतक्या वर्षांचा प्रश्न निकाली निघाला, या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.