शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

स्मशानभूमीत कुडकुडणार पोरगं पाहिलं अन् तात्यांचे मन हेलावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:54 IST

kolhapur News-पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील संभाजी पांडुरंग जाधव (मिठारी तात्या) अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.

ठळक मुद्देस्मशानभूमीत कुडकुडणार पोरगं पाहिलं अन् तात्यांचे मन हेलावलं पंचगंगा घाटावर बसवला गरम पाण्यासाठी सोलर

ज्योती पाटीलपाचगाव : पंचगंगा घाटावर मुंडन सुरू असताना थंडीत नऊ-दहा वर्षाच्या एका मुलाला कुडकुडताना पाहून अंत्यदर्शनासाठी तेथे गेलेले फुलेवाडीतील मिठारी तात्यांचे मन हेलावलं. ते अस्वस्थ झाले. त्यांनी घाटावर गरम पाणी मिळण्यासाठी सोलर बसवण्याची कल्पना डोक्यात आणली आणि त्यांनी लगेच ती सत्यातही उतरवली. तत्काळ घरी जाऊन त्याची अंलबजावणी केली. तात्यांनी बसवलेला तोच सोलर आज पंचगंगा घाटावरील स्मशानभूमीत दिमाखात उभा आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले संभाजी जाधव हे फुलेवाडी परिसरात मिठारी तात्या या नावाने सर्वपरिचित असणारे व्यक्तिमत्व. त्यांना सर्वजण तात्या म्हणूनच हाक मारतात. पन्नाशी उलटून गेलेल्या तात्यांचा शेती हाच व्यवसाय असून जोडीला पिठाची गिरणीही चालवतात, यामध्ये त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे.

फुलेवाडी ते रिंगरोड भागात कोणाचाही मृत्यू झाला की गेल पहिला फोन तात्यांना येतो. तात्या वेळ, काळ न बघता अशा कामात तत्काळ मदतीला धावून जातात. कोणी त्यांना याबद्दल विचारले की तात्यांचं ठरलेलं  वाक्य हमखास कानी पडणारच,'...शेवटच्या घडीला आपण त्याला साथ दिली न्हाई तर आजवर त्यानं मला तोंडभरून हाक मारलेल्या त्या हाकेला काही अर्थ राहील का?' त्यांची माणुसकी आणि समाजाबद्दल असलेले प्रेम व आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला दिशा देणाराच म्हणावा लागेल.

यामागे तात्यांचे  कोणतेही राजकीय कारण नाही, कोणताही स्वार्थ नाही की कसली कधी अपेक्षा नाही. गिरणीतून मिळणार्‍या रोजच्या कमाईतून एक ठराविक वाटा अशा कामांसाठी तात्यांनी काढलेला असतोच.

सकाळी ७ ची वेळ. कोणा एका गल्लीतल्या अंत्ययात्रेसोबत त्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी पंचगंगा घाटावर गेलेल्या फक्त मिठारी तात्यांनाच त्या पोराची हुडहुडी जाणवली. इतक्या लोकांनी इतकी वर्षे अशी अनेक दृष्य पाहिली असतील, पण वाईट वाटून तत्काळ कृती करण्याची भूतदया फक्त तात्यानीच दाखवली आणि त्यांनी तेथे तत्काळ गरम पाण्यासाठी सोलर बसविला. हेच खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन म्हणावे लागेल. देव माणसातही आहे, तात्यांच्या या कामगिरीतून याचाच खऱ्या अर्थाने प्रत्यय आल्याचे सिद्ध झाले आहे.

यामागे कोणतीही राजकीय भावना नाही की कशाची अपेक्षा नाही. फक्त मला झालेली जाणीव आणि माणुसकीच्या भावनेतून मी हा प्रयत्न केलेला आहे. पंचगंगा स्मशानभूमीत बसवलेला हा सोलर वॉटर हिटर सर्वांच्या उपयोगी पडावा, हीच यापाठीमागची भावना आहे. संभाजी पांडुरंग जाधव,  (मिठारी तात्या), फुलेवाडी.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर