आंबा: प्रशासकीय यंत्रणेच्या मोठ्या ब़ंदोबस्तात आज सकाळपासून विशाळगडावरअतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.गोपणीय पध्दतीने आज सकाळपासून कारवाईस प्रारंभ केला.पावसाळा तोंडावर आल्याने व काही ग्रामस्थ न्यायालयात गेल्याने अतिक्रमण पावसाळ्यानंतर होईल म्हणून व्यावसायिक उन्हाळी सुट्टीतील पर्यटकांच्या प्रतिक्षेत होते.मध्यंतरी सहा दिवस अवकाळी पावसामुळे येथील पर्यटनात खंड पडला होता.आजच्या आकस्मिक मोहीमेमुळे व्यावसाईकांच्या तोंडचे पाणी पळाले.पुरातत्व, वनविभाग व महसूल विभागाच्या वतीने बारा ते पंधरा अतिक्रमणे काढण्याची सज्जता केली आहे.गोपणिय रित्या आजची मोहीम राबवली आहे. यासाठी शाहुवाडी व कोल्हापूरहून मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज आहे.मध्यंतरी नूतन जिल्हा पोलिस प्रमुखांनी विशाळगडास भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली होती.शुक्रवार ते रविवार गडावर पर्यटक व भाविकांची गर्दी असते पण आज कारवाई चालू असल्याने केंबुर्णेवाडी येथेच सर्व वाहणे रोखण्यात आली आहेत.त्यामुळे गड व गजापूर परीसरात शुकशुकाट पसरला होता.
कडक बंदोबस्तात विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:43 IST