शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

आमदारकीचा पगार जनतेच्या विम्यासाठी

By admin | Updated: July 7, 2015 21:10 IST

हसन मुश्रीफ : कागल येथे पंतप्रधान विमा योजनेचा धनादेश प्रदान

कागल : पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमुळे अपघाती मृत्यू, जायबंदी झाल्यानंतर विमा रकमेचे संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून मी माझा आमदारकीचा सर्व पगार जनतेचा विमा उतरविण्यासाठी खर्च करणार आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.बापूसाहेब महाराज चौकात आयोजित योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी आणि इतर गरजू लोकांचा प्रत्येकी १२ रुपयेप्रमाणे एक लाख लोकांचा विमा स्वत: उतरविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता. त्याचा प्रारंभ सोमवारी करण्यातआला. आय. सी. आय. सी. सी. बँकेचे कांचन कुलकर्णी यांच्याकडे धनादेश प्रदान केला.मुश्रीफ म्हणाले की, मला दरमहा आमदारकीचा एक लाख रुपये पगार मिळतो. ही रक्कम यासाठी प्रत्येक वर्षी वापरणार आहे. कार्यकर्त्यांनी गावागावांत गरजू लोकांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आय.सी.आय.सी.सी. बँकेचे कांचन कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्यांबद्दल आस्था असल्यामुळेच आ. मुश्रीफ यांनी हा संकल्प केला आहे. इतर लोकप्रतिनिधींसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे. दरवर्षी १२ लाख रुपये रक्कम ते मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या उत्पन्नातून खर्च करणार आहेत, ही एक दुर्मीळ घटना आहे.माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत, तर भैया माने यांनी प्रास्ताविक केले. संजय हेगडे, राहुल घोरपडे, शिवानंद माळी यांची भाषणे झाली. युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, मुरगूडच्या नगराध्यक्षा वसुधा कुंभार, रमेश माळी, प्रवीण भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)