शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती मस्त.. प्रशासन अन् राजकारणी मात्र सुस्त..!

By admin | Updated: September 10, 2014 00:27 IST

आजरा तालुक्यातील चित्र : हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना

कृष्णा सावंत - पेरणोली -गेले महिनाभर आजऱ्याच्या पश्चिम भागात हत्तींचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. हत्तीच्या धुमाकुळीकडे प्रशासन, राजकारण्यांसह कुणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यामुळे ‘हत्ती मस्त... प्रशासन आणि राजकारणी झाले सुस्त...’ अशी आजरा तालुक्याची अवस्था झाली आहे.हत्तींचा उपद्रव आजऱ्यासह चंदगड व भुदरगड तालुक्यांत अनेक वर्षांपासून सुरू आहे. हत्तींना माघारी पाठविण्याच्या वनविभागाच्या मोहिमेशिवाय कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन:पुन्हा आजरा व चंदगड तालुक्यांत हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींनी याकडे एकदाही गांभीर्याने पाहिलेले नाही.यापूर्वी हत्तीने हल्ला केलेल्या अनेक घटना आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांत घडलेल्या आहेत. भादवणमधील विजय गोरे यांना हत्तीने गंभीर जखमी केल्यानंतर आजरा तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हाळोली, मसोली, पेरणोलीहून भुदरगडकडे जाणारा हत्ती आता भादवण व हाजगोळी परिसरातही वावरू लागला आहे. भादवणमधील घटनेनंतर सोहाळेवरून पेरणोली परिसरात हत्ती आला. तो पेरणोलीमधील दलित वस्तीशेजारी रात्रीच अमित सावंत यांना दिसला. प्रसंगावधान राखून सावंत यांनी तेथून पळ काढला.हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना घडत आहेत. त्याकडे वनविभाग वगळता कोणाचेही लक्ष नाही. तालुक्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आमदार के. पी. पाटील यांच्या मतदारसंघात सातत्याने हत्तींचा उपद्रव आहे. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील वझरे परिसरातही हत्तींचा उपद्रव असतो, तर चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या मतदारसंघातूनच हत्ती येण्यास सुरुवात होते. या तीनही आमदारांनी ठोस उपाययोजनेबाबत सभागृहात आवाज उठविला नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे. रस्ते विकास म्हणजेच खरा विकास समजून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे.जनजागृती हवी, गैरसमज दूर व्हावेतवनविभागाने हत्तींना माघारी पाठविण्याची मोहीम राबविण्यापेक्षा हत्ती बिथरू नये, यासाठी तीनही तालुक्यांत जनजागृती व जनतेमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. हत्ती का येतात, याचा अभ्यास करून उपाययोजना राबविण्यासाठी जनचळवळ उभी करण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्याचा हा परिणाम आहे.- कॉ. संपत देसाई, निमंत्रक, पर्यावरण संवर्धन संघर्ष समिती