शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:38 IST

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईलासामोरे जाणाºया चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

शशिकांत भोसले।सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चिकोत्रा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर महावितरणपाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू केली जाते; पण हा उपसाबंदीचा आदेश झुगारून स्वत:ला बागायत शेतकरी समजणारे काहीजण राजरोसपणे विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत. परिणामी सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनत चालला असून, चिकोत्रा प्रकल्पात होणाराकमी पाणीसाठा हे त्याचे प्रमुखकारण आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून फक्त दोनचवेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.चिकोत्रा प्रकल्प परिसरात असणारे पावसाचे अल्प प्रमाण व धरण क्षेत्रात येणाºया पाण्याचे कमी स्रोत यामुळे हा प्रकल्प जास्तीत जास्त ६५ ते ७० टक्केच भरतो. पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याचीगरज आहे; पण राजकीय पातळीवरून अथवा प्रशासनाकडून तशीभरीव हालचाल होत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेला सातत्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.1 प्रकल्पात असणारा अत्यल्प पाणीसाठा व पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले भरमसाट पाणी परवाने यामुळे या खोºयाचा पाणीप्रश्न येथूनपुढे भीषण होणार आहे.2 काही शेतकरी तर अनधिकृतपणे थेट पाणी उपसा करत आहेत. ज्यावेळी कारवाई करायची वेळ येते, त्यावेळी पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. यामुळेच अशा शेतकºयांचे फावत आहे.3 पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाºयांनी समन्वयाने योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना शक्य आहे, अन्यथा चिकोत्रा नदीकाठावरील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर होणार आहे.महावितरणकडून दुर्लक्ष : बेसुमार पाणी उपसाचिकोत्रा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसांत नदीपात्र कोरडे पडते. यावरून पाणी किती मोठ्या प्रमाणात उपसा होते याची कल्पना येते. काही हुशार बागायत शेतकरी तर पाणी नदीपात्रात आलेले पाहताच उपसाबंदी झुगारून राजरोसपणे दिवसाढवळ्या आकडे टाकून बेसुमार पाणी उपसा करत आहेत. अशा काही शेतकºयांना पाटबंधारे व महावितरणच्या संबंधितांकडून कायम अभय मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.आता थेट अशा अधिकाºयांवर मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत. आजपर्यंत बेकायदा पाणी उपसा करणारे अनेक मोटारपंप ग्रामस्थांनी दाखवून दिले; पण कोणतीही कारवाई न करता सोडल्यामुळे असे शेतकरी राजरोसपणे आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत.