शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चिकोत्रा नदीवरील उपसाबंदी नावापुरतीच, विद्युत पुरवठा खंडित : विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा;ग्रामपंचायतीची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:38 IST

सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईलासामोरे जाणाºया चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

शशिकांत भोसले।सेनापती कापशी : गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या चिकोत्रा खोऱ्याला यंदाही मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. चिकोत्रा धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर महावितरणपाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी लागू केली जाते; पण हा उपसाबंदीचा आदेश झुगारून स्वत:ला बागायत शेतकरी समजणारे काहीजण राजरोसपणे विद्युततारांना आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत. परिणामी सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे.चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर बनत चालला असून, चिकोत्रा प्रकल्पात होणाराकमी पाणीसाठा हे त्याचे प्रमुखकारण आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून फक्त दोनचवेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.चिकोत्रा प्रकल्प परिसरात असणारे पावसाचे अल्प प्रमाण व धरण क्षेत्रात येणाºया पाण्याचे कमी स्रोत यामुळे हा प्रकल्प जास्तीत जास्त ६५ ते ७० टक्केच भरतो. पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याचीगरज आहे; पण राजकीय पातळीवरून अथवा प्रशासनाकडून तशीभरीव हालचाल होत नसल्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेला सातत्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.1 प्रकल्पात असणारा अत्यल्प पाणीसाठा व पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेले भरमसाट पाणी परवाने यामुळे या खोºयाचा पाणीप्रश्न येथूनपुढे भीषण होणार आहे.2 काही शेतकरी तर अनधिकृतपणे थेट पाणी उपसा करत आहेत. ज्यावेळी कारवाई करायची वेळ येते, त्यावेळी पाटबंधारे व महावितरणचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवितात. यामुळेच अशा शेतकºयांचे फावत आहे.3 पाटबंधारे व महावितरणच्या अधिकाºयांनी समन्वयाने योग्य नियोजन केले तर सुरळीत पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना शक्य आहे, अन्यथा चिकोत्रा नदीकाठावरील ५२ गावांचा पाणीप्रश्न मोठा गंभीर होणार आहे.महावितरणकडून दुर्लक्ष : बेसुमार पाणी उपसाचिकोत्रा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसांत नदीपात्र कोरडे पडते. यावरून पाणी किती मोठ्या प्रमाणात उपसा होते याची कल्पना येते. काही हुशार बागायत शेतकरी तर पाणी नदीपात्रात आलेले पाहताच उपसाबंदी झुगारून राजरोसपणे दिवसाढवळ्या आकडे टाकून बेसुमार पाणी उपसा करत आहेत. अशा काही शेतकºयांना पाटबंधारे व महावितरणच्या संबंधितांकडून कायम अभय मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.आता थेट अशा अधिकाºयांवर मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत. आजपर्यंत बेकायदा पाणी उपसा करणारे अनेक मोटारपंप ग्रामस्थांनी दाखवून दिले; पण कोणतीही कारवाई न करता सोडल्यामुळे असे शेतकरी राजरोसपणे आकडे टाकून पाणी उपसा करत आहेत.