शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीसीसी’सह २१३ विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:05 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील २१३ विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ एप्रिलनंतर या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ठळक मुद्देसहकार विभाग कर्जमाफीत गुंतल्याने निर्णय २७ एप्रिलनंतर प्रक्रिया सुरू होणार

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामात सहकार विभाग गुंतला आहे. हे काम प्राधान्याने व बिनचूक करता यावे, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील २१३ विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ एप्रिलनंतर या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. पीक कर्ज, पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जखात्यामधील ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली दोन लाखांपर्यंतची रक्कम माफ होणार आहे. विकास संस्थांकडून आलेल्या माहितीची पडताळणी करणे, माहिती अपलोड करणे, शेतकऱ्यांच्या याद्यांची प्रसिद्धी, कर्ज खातेदारांचे आधार प्रमाणीकरण, जिल्हास्तरीय समितीमार्फत तक्रार निवारण, आदी कामे कर्जमाफीमध्ये करावी लागणार आहेत. या थकबाकीदारांना कर्जमाफी देऊन त्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेण्यास पात्र करायचे आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या कामाचा प्राधान्य विचारात घेऊन सहकार विभागातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यामध्ये गुंतले आहेत.त्यातच राज्यातील ३१ पैकी २२ जिल्हा बॅँका व २१ हजार २२५ पैकी ८१९४ विकास संस्था जानेवारी ते जून २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र आहेत. या संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजना अंमलबजावणीस विलंब होऊ शकतो. तसे होऊ नये, म्हणून शासनास असलेल्या अधिकारात कलम ७ कक मधील तरतुदीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँका व विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश ज्या बॅँका व संस्थांना दिल्या आहेत व ज्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे सुरू झालेले आहे, अशा संस्थांना यातून वगळले आहे, असे आदेश सहकार विभागाचे अप्पर सचिव रमेश शिंगटे यांनी दिले आहेत.प्राधिकरणाच्या आदेशाकडे लक्षजिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी संलग्न संस्थांकडून ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार (दि. ३१) पर्यंत अंतिम मुदत आहे, मात्र या निर्णयाने ही प्रक्रिया थांबणार आहे. २७ एप्रिलनंतरच नव्याने प्रक्रिया सुरू होणार की स्थगित केल्यापासून सुरू होणार, याबाबत प्राधिकरण काय आदेश देते, यावर अवलंबून राहणार आहे.

दृष्टिक्षेपात विकास संस्था :विकास संस्था           निवडणुकीस पात्र         निवडणूक  अंतिम टप्प्यात          स्थगित१९४१                                      ३१३                      १००                                     २१३

जिल्ह्यातील ३१३ विकास संस्था निवडणूकीसाठी पात्र आहेत. त्यातील १०० संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने त्या वगळून उर्वरित २१३ संस्थांच्या निवडणुका स्थगित होतील.- अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक)

 

कोल्हापूरसह, सांगली व सातारा जिल्हा बॅँकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. तीन महिन्यांनंतर म्हणजेच २७ एप्रिलनंतर स्थगित केल्यापासून प्रक्रिया राबवायची की नव्याने, याबाबत प्राधिकरणाकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच कळेल.- श्रीकृष्ण वाडेकर (विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर)

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर