शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ

By admin | Updated: December 19, 2014 00:28 IST

संसारावर तुळशीपत्र ठेवून सुरू आहे सेवा : समाजातील दानशूरांकडून अश्विनीला हवाय मदतीचा हात

अनिल पाटील -मुरगूड -‘म्हातारपण नको गा देवा’ असा सूर सर्वत्र पाहावयास मिळतो. कारण उतरत्या वयात वृद्ध पती-पत्नीला एकमेकांचाच आधार बनावा लागतो, तर काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो; पण याला अपवाद आहे मुरगूडमधील घटना. लग्न होऊन आपल्या पती, मुलांबरोबर आनंदात राहण्याचे सोडून गेल्या तीन वर्षांपासून अश्विनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा-शुश्रूषा करत आहे. संधिवाताने दोन्हीही पायाने अधू झालेल्या आपल्या आईला स्वत:च्या पायावर उभा करूनच आपल्या संसाराकडे परतणार, या अश्विनीच्या निश्चयामुळे वंशाला दिवाच पाहिजे, अशा मानसिकतेमध्ये अडकलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आधुनिक काळातील ‘श्रावणबाळ’ ठरलेल्या अश्विनीला मात्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाचे पाठबळ हवे आहे.कोगनोळी (ता. चिकोडी) येथील आप्पासाहेब कदम हे व्यवसायाने डॉक्टर. अत्यल्प फीमध्ये लोकांवर उपचार करणारे म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. अगदी थोडा थोडा वाटणारा त्रास हा पुढे इतका वाढला की, त्यांना चालता, उठता येईना. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च झाला. खर्चापोटी कदम यांनी आपली शेती, जमीन आणि घरही विकले. शस्त्रक्रिया झाली; तरीसुद्धा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दैवाला दोष देत कदम कुटुंब मुरगूडमध्ये वास्तव्याला आले. पाच वर्षांपूर्वी दिंगणघाट (ता. वर्धा) येथील सधन कुटुंबातील मुलाबरोबर अश्विनीचे लग्न झाले. अश्विनी आपल्या संसारात सुखी होती; पण तीचे मन मात्र आई -वडिलांकडेच धावत होते. शेवटी ती एक वर्षांच्या छोट्या मुलासह मुरगूडमध्ये दाखल झाली आणि आपल्या आईची सेवा सुरू केली; पण नियतीने पुन्हा एकदा प्रताप दाखवला. वडिलांच्या हृदयामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.शस्त्रक्रियेची गरजसध्या तीन वर्षांपासून अश्विनी मुरगूडमध्येच आई-वडिलांची सेवा करत आहे. आईला तर चालताच येत नाही. वडीलही बेडवरच असल्याने त्यांचा व्यवसायही बंद पडला आहे. आईला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डॉक्टरांनी अंदाजे चार लाख रुपये खर्च सांगितल्याने अश्विनीसमोर डोंगरच कोसळला आहे. आपल्या संसाराचा विचार न करता आई- वडिलांची नि:स्वार्थी सेवा करणाऱ्या अश्विनीच्या मनाला उभारी देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.