शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 06:18 IST

मंत्री हसन मुश्रीफ : ‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’ आयोजित ‘सरपंच खरा योद्धा’ वेबिनारमध्ये ग्वाही

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमध्ये गावागावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांनी ‘कोरोना योद्धे’ म्हणून मोठे काम केले आहे. त्यामुळेच शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रोखण्यात यश आले. यासाठी ग्रामपंचायतींना खर्चही आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना जादा निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

‘लोकमत’ आणि ‘बीकेटी टायर्स’ यांच्या वतीने आयोजित ‘सरपंच खरा योद्धा’ या विषयावरील वेबिनारमध्ये मुश्रीफ यांनी या सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करताना ‘लोकमत’लाही या उपक्रमासाठी धन्यवाद दिले. या वेबिनारमध्ये ‘बीकेटी टायर्स’चे राजीव कुमार, प्रमुख मार्गदर्शक माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अन्य मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार, पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील, सरपंच परिषदेचे संस्थापक-विश्वस्त अविनाश आव्हाड, अमरावती जिल्ह्णातील आदर्श ग्राम खिरगव्हाणचे आदर्श व सरपंच सेवा महासंघाचे पुरुषोत्तम घोगरे-पाटील सहभागी झाले होते.या सर्व मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा आढावा घेऊन मुश्रीफ म्हणाले, गावात परतलेल्यांसाठी ‘मनरेगा’ची कामे सुरू करणे, कोरोनाची ग्रामीण भागाची स्वतंत्र आकडेवारी जाहीर करणे, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळताच त्याचे वितरण करणे, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री निधीतून काही निधी ग्रामपंचायतींना देता येईल का ते पाहणे यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामविकासाच्या बाबतीत महाराष्ट्राने देशभरात मोठे काम केले आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने यात भर घालण्याचे काम करू.ग्रामपंचायतींची वर्गवारी करूननिधी द्यावा : पोपटराव पवारपोपटराव पवार म्हणाले, महाराष्ट्रातील २८ हजारांपैकी २२ हजार ग्रामपंचायती तीन हजार लोकसंख्येच्या आतील आहेत. लोकसंख्येच्या आधारावरील निधी वाटपाच्या धोरणामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यापेक्षा शहरी, वनक्षेत्रातील, आदिवासी, दुष्काळी आणि पाणी सुविधा असलेल्या ग्रामपंचायती अशी वर्गवारी करून निधीचे वितरण केले जावे. ‘आपलं सरकार’ या पोर्टलसाठी गावातील युवकांना संधी द्यावी. ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्ती अभियान पुन्हा नव्याने सुरू करावे.

भास्कर पेरे-पाटील म्हणाले, सरपंच कोरोनाच्या काळातच योद्धा झालेला नाही. तो पहिल्यापासूनच योद्धा म्हणून काम करतो. ग्रामविकासाच्या बाबतीत काम सुरू आहे. मात्र त्याला म्हणावा तसा वेग आलेला नाही. अजूनही अनेक गावांमध्ये दयनीय अवस्था आहे. यासाठी आणखी जोर पकडावा लागणार आहे.

अविनाश आव्हाड म्हणाले, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंचांचे मानधन थकीत आहे. ते लवकर अदा करावे. ग्रामपंचायतींवर अचानक प्रशासक आणणे हेदेखील योग्य नाही. पुरुषोत्तम घोगरे-पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी आणि त्याचे व्याजही शासनाने परत घेतले. ग्रामपंचायतीचे उत्पन्न अडीच लाख रुपये आणि त्यातील एक लाख ४८ हजार रुपये संगणक परिचालन करणाºयाला द्यावे लागतात. त्यापेक्षा हा आॅपरेटर नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला द्या.अनिरुद्ध हजारे यांनी स्वागत करून या वेबिनारमागील ‘लोकमत’ची भूमिका सांगितली. संकर्षण कराडे यांनी सूत्रसंचालन केले. वेबिनारमध्ये सहभागी सर्वांनीच ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुढच्या काळात ग्रामविकासाच्या कार्यात ‘लोकमत’च्या नेतृत्वाखाली उपक्रम घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.चंद्रकांत दळवी यांच्या सूचनाच्राज्यातील ग्रामपंचायतींना विशेष कोरोना निधी द्यावा.च्गावाकडे आलेल्या नागरिकांना ‘मनरेगा’ची कामे द्या.च्कोरोनाग्रस्तांची ग्रामीण भागाची स्वतंत्र आकडेवारी द्यावी.च्सरपंच परिषदा घेऊन नवे व्यासपीठ निर्माण करावे.च्संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त अभियान नव्या निकषांनुसार सुरू करावे.आजरा तालुक्यातील महिला सरपंचांचा उल्लेखआजरा तालुक्यातील मसोली गावच्या सरपंच छायाताई पोवार या कोरोनाकाळात काम करताना पडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांना शासनाकडून अर्थसाहाय्य मिळावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे अविनाश आव्हाड यांनी केली.

टॅग्स :sarpanchसरपंचHasan Mushrifहसन मुश्रीफ