शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:14 IST

                                     

ठळक मुद्दे दिव्यांगांच्या योजनांची शासनाकडून प्रभावी अंमलबजावणी : रामदास आठवले

कोल्हापूर :  दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी  शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केले. 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘एल्मिको’च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत देशातील ५ लाख १० हजार दिव्यांगांना ४१८ कोटी रुपये खर्चून साहित्य वितरित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या साहित्य वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होते.

कटारिया म्हणाले, कोल्हापुरातील हे ५७६ वे शिबिर असून यापुढच्या काळात दिव्यांगांना उत्तम दर्जाचे साहित्य देण्यासाठी ‘एल्मिको’ने जर्मनीतील आॅटोबॉक, इंग्लंडमधील मोटिवेशन ट्रस्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही सामंजस्य करार केले आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव करून कटारिया म्हणाले, आज या शिबिरामध्ये १० कोटी रुपये खर्च करून १५ हजार ६९५ दिव्यांगांना २३ हजार ४९५ साधने वितरित करण्यात आली आहेत. आपल्याकडे असलेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशातील १५ कोटी घरांना ३ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाला ८५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यातील ९५० कोटी रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात येत आहेत. खासदार धैर्यशील माने, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांची यावेळी भाषणे झाली.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी आभार मानले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‘लोकमत’चा उल्लेखखासदार संजय मंडलिक यांनी या दिव्यांगांचे साहित्य पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा कार्यक्रम निश्चित झाल्याचे सांगितले. यापुढच्या काळात वेळेत कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Divyangदिव्यांगRamdas Athawaleरामदास आठवलेministerमंत्रीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद