शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

शिक्षण तिसरी अन् आॅनलाईन गंडा २२ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:51 IST

शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् रविवारी अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसंशयितास दिल्लीतून अटक : लक्ष्मीपुरी पोलिसांची कामगिरी कोल्हापुरातील व्यावसायिकाची फसवणूक

कोल्हापूर : शिक्षण अवघे तिसरीपर्यंतचे अन् दिल्लीत बसून आॅनलाईनवरून कोल्हापूरच्या व्यापाऱ्यास २२ लाखांचा गंडा घातला. अशा बहाद्दरास लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन ताब्यात घेतले अन् अटक केली. अजय गंगादास दास (वय २२, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. कर्जाचे आमिष दाखवून आॅनलाईनवरून विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडून संभाजीनगरातील गजानन भोसले (वय ६३) यांची ही फसवणूक झाली आहे, त्यांनीच लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजानन भोसले (वय ६३) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्याबाबत आलेली जाहिरात वाचून त्यांनी सौभाग्य फायनान्स कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना गोरख शर्मा नावाच्या व्यक्तीने प्रकल्प अहवाल पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना आठ कोटी ४० लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्रही दिले.कर्जासाठी विविध प्रकारचे चार्जेस म्हणून १३ डिसेंबर २०१७ ते २ जुलै २०१८ कालावधीत तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर २२ लाख ३७ हजार ९८० रुपये पाठविण्यास सांगितले. पैसे देऊनही कर्ज मंजूर होत नसल्याने भोसले यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली, त्यानंतर त्यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांना दिल्लीत जाऊन शोधण्यासाठी प्रवास खर्च म्हणून भोसले यांच्याकडे २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून संशयित हेड कॉन्स्टेबल अजिज शेख व चहा टपरीचालक दाऊद पाटणकर यांना दि. २४ जूनला पकडले होते.हॉटेलमध्ये वेटरचे कामआठवड्यापूर्वीच लक्ष्मीपुरीतील पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी या प्रकरणातील संशयित अजय दास यास ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. रविवारी रात्री त्याला अटक केली. प्राथमिक तपासात तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता, तसेच त्याचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत झाले असल्याची माहिती पुढे आली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर