शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शिक्षणमंत्र्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही; अमर चव्हाण यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 20:00 IST

सरकारी शाळांसाठी गडहिंग्लजला मोर्चा, महिन्याचा अल्टीमेटम

गडहिंग्लज : वीस पटाखालील शाळा बंदचा निर्णय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिन्याच्या आत मागे घ्यावा, अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा माजी सभापती अमर चव्हाण यांनी दिला.

सरकारी प्राथमिक शाळा बचाव समिती व डी.एड्.बी.एड्. बेरोजगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. लक्ष्मी चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता प्रांतकचेरीच्या आवारात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, २० पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाचाच असतानाही शिक्षणमंत्री दुटप्पी भूमिका घेत आहेत. संबंधित अध्यादेश मागे न घेतलेस राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे म्हणाले, सरकारी शाळा वाचविण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, गोरगरीबांच्या शाळांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेसचे दिग्विजय कुराडे म्हणाले, विशिष्ट विचारसरणीचे शिक्षक नेमण्यासाठीच शिक्षक भरती बंद आहे. सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचाच हा डाव हाणून पाडला पाहिजे.

याप्रसंगी बसवराज आजरी, संतोष चिक्कोडे, सचिन देसाई, सुरेश थरकार, बाळासाहेब मोर्ती, रवींद्र यरकदावर यांचीही भाषणे झाली. मोर्चात मधुकर येसणे, सुभाष निकम, आण्णासाहेब शिरगावे, प्रशांत देसाई, संजय चाळक, अजित बंदी,अश्विन यादव, बसवराज आरबोळे, संजय सुतार, उज्वला दळवी, गीता पाटील,  आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.निवेदनातील मागण्या :

शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, डी.एड्., बी.एड्. बेरोजगारांना सेवेत सामावून घ्या, कंत्राटी शिक्षक भरती नको, शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.

यांनीही दिला पाठिंबा

गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना आणि सखी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

शेतमजूर महिलेचा इशारा

मराठी शाळा बंद केल्या तर गरीब मुलं कुठे जातील. आई-बाप नसलेल्या मुलांनी कसं शिकायचं? आमची मागणी मान्य झाल्याशिवाय इथून हलणार नाही ? या शब्दांत खणदाळच्या सुनंदा धनवडे या शेतमजूर महिलेने आपली संतप्त भावना व्यक्त केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर