शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वाचन संस्कृतीमुळेच शैक्षणिक वातावरण समृध्द : गायकवाड, राजर्षी शाहू ग्रंथालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 11:30 IST

व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले.

ठळक मुद्देवाचन संस्कृतीमुळेच शैक्षणिक वातावरण समृध्द : गायकवाडराजर्षी शाहू ग्रंथालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले.कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात नव्याने सुरुवात केलेल्या राजर्षी शाहू ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते.गायकवाड म्हणाले, ग्रंथदानातून वाचन संस्कृती वाढणार असून, त्यातूनच शैक्षणिक विकास होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघाला सक्षम होण्याची आवश्यकता आहे.ग्रंथदान उपक्रमाबाबत मिलिंद पांगिरेकर यांनी माहिती दिली. प्राचार्य जीवन साळोखे यांनी ग्रंथालय स्थापनेचा उद्देश सांगितला. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. संघाचे व्हा. चेअरमन बी. आर. बुगडे यांनी आभार मानले. डी. एस. लवटे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महामंडळाचे आजीव सदस्य डी. एस. पाटील, उपाध्यक्ष आर. डी. कुंभार, सदस्य एस. वाय. पाटील, शिवाजीराव कोरवी, एम. आर. पाटील, जे. आर. समुद्रे, जी. ए. पाटील, के. बी. ठोंबरे, एस. एस. खोचरे, एन. एस. घोरप, एस. एस. देवेकर, आदी उपस्थित होते.३०० पुस्तके भेट....याप्रसंगी ग्रंथालयासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, जयश्री दानवे, अशोक पाटील यांच्यासह संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी सुमारे ३०० पुस्तके भेट दिली. 

 

टॅग्स :literatureसाहित्यlibraryवाचनालयkolhapurकोल्हापूर