शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शिक्षण विभागाकडून ‘डिजिटल शाळा’ संदर्भात माहिती मागविली- लोकमतचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:49 IST

यड्राव : जिल्ह्यातील किती शाळा प्रत्यक्षात डिजिटल बनल्या आहेत, कोणकोणती साधने मिळाली आहेत, कोणत्या निधीतून ते साहित्य मिळाले, शाळा डिजिटलसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी केली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळण्याची प्रत्यक्ष संधी निर्माण झाली आहे.‘लोकमत’मध्ये ‘विद्यार्थी डिजिटल शाळेच्या प्रतीक्षेत’ ...

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण संधीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, याकरिता शासनाकडून ‘

यड्राव : जिल्ह्यातील किती शाळा प्रत्यक्षात डिजिटल बनल्या आहेत, कोणकोणती साधने मिळाली आहेत, कोणत्या निधीतून ते साहित्य मिळाले, शाळा डिजिटलसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी केली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळण्याची प्रत्यक्ष संधी निर्माण झाली आहे.

‘लोकमत’मध्ये ‘विद्यार्थी डिजिटल शाळेच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.जिल्ह्यातील शाळांकडून शिक्षणाधिकाºयांनी मागवून घेतलेल्या माहितीमध्ये, शाळा डिजिटल आहे का? शाळेतील डिजिटल वर्गाची संख्या किती? डिजिटल स्कूलअंतर्गत एलईडी टीव्ही, एलएफडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, टॅब यापैकी कोणकोणती साधने आहेत? शाळेत संगणक लॅब आहे का? ई-लर्निंग सॉफ्टवेअर अद्ययावत आहे का? डिजिटल साहित्य लोकसहभाग, १४ वा वित्त आयोग, जि. प. स्व निधी आमदार-खासदार यांच्या निधीतून का अन्य कोणत्या मार्गाने मिळाला, याबाबतची सविस्तर व तपशिलवार माहिती मागवून घेतली आहे. त्याचबरोबर शाळा डिजिटल नसेल, तर कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबतचीही माहिती मागवून घेतली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, याकरिता शासनाकडून ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला; परंतु शासनाचा निधी व राजकीय मंडळींची आधुनिक शिक्षणाबाबतची अनास्था यामुळे अशा निधीची पुरेपूर अंमलबजावणी न होताच पूर्णत्वासाठी कागदपत्रे पूर्ण करण्याची सक्ती शाळांना होत असल्याने ग्रामीण विद्यार्थी डिजिटल शाळांच्या प्रतीक्षेत आहेत.‘लोकमत’च्या वृत्तामुळे शिक्षण विभाग जागृत झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती घेतली आहे. याची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी शासकीय अधिकाºयांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात पटसंख्या वीसहून अधिक असलेल्या १५८१ शाळा आहेत. त्यापैकी १३८९ शाळा डिजिटल झाल्याची माहिती शाळांकडून आलेल्या अहवालानुसार मिळालेली आहे. शाळांमध्ये डिजिटलचे साहित्य असल्याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. जानेवारीअखेर संपूर्ण जिल्ह्यातील शाळा डिजिटल करणार असल्याची माहिती दिली.-सुभाष चौगुले,प्राथमिक शिक्षणाधिकारी--

टॅग्स :digitalडिजिटलkolhapurकोल्हापूर